शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने भाकड जनावरे खरेदी योजना राबवावी, संगमनेरातील प्रशासकीय भवनात बांधली जनावरे, शिव आर्मी शेतकरी संघटनेचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:40 IST

Ahilyanagar: भाकड जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद असल्याने ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहे. त्यामुळे सरकारने भाकड जनावरे आणि गुऱ्हे खरेदी योजना राबवावी, अशी मागणी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संगमनेर - सध्या राज्यात भाकड जनावरे, गोऱ्हे यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या गरजेनुसार पाळलेली जनावरे जेव्हा भाकड होतात, त्यावेळी त्या जनावरांचा उपयोग होत नाही. परंतु सद्यस्थितीत अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद असल्याने ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहे. त्यामुळे सरकारने भाकड जनावरे आणि गुऱ्हे खरेदी योजना राबवावी, अशी मागणी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून बुधवारी (दि.१२) संगमनेरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनात आंदोलन जनावरे, गोऱ्हे बांधण्यात आली आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २९ जुलै रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना संगमनेर उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले होते.

दुधाला दर मिळत नाही. त्यात भाकड जनावरे, गोऱ्हे यांचे संगोपन करणे, त्यांची देखभाल करणे हा खर्चिक आणि वेळखाऊ प्रकार आहे. तो सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी अनेक वेळा जनावरे रस्त्यांवर सोडली जातात. त्यामुळे अपघात शेतीचे नुकसान आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. या जनावरांचा योग्य तऱ्हेने संगोपन करण्यासाठी गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावी. आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरGovernmentसरकार