शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सरकारने भाकड जनावरे खरेदी योजना राबवावी, संगमनेरातील प्रशासकीय भवनात बांधली जनावरे, शिव आर्मी शेतकरी संघटनेचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:40 IST

Ahilyanagar: भाकड जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद असल्याने ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहे. त्यामुळे सरकारने भाकड जनावरे आणि गुऱ्हे खरेदी योजना राबवावी, अशी मागणी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संगमनेर - सध्या राज्यात भाकड जनावरे, गोऱ्हे यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या गरजेनुसार पाळलेली जनावरे जेव्हा भाकड होतात, त्यावेळी त्या जनावरांचा उपयोग होत नाही. परंतु सद्यस्थितीत अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद असल्याने ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहे. त्यामुळे सरकारने भाकड जनावरे आणि गुऱ्हे खरेदी योजना राबवावी, अशी मागणी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून बुधवारी (दि.१२) संगमनेरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनात आंदोलन जनावरे, गोऱ्हे बांधण्यात आली आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २९ जुलै रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना संगमनेर उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले होते.

दुधाला दर मिळत नाही. त्यात भाकड जनावरे, गोऱ्हे यांचे संगोपन करणे, त्यांची देखभाल करणे हा खर्चिक आणि वेळखाऊ प्रकार आहे. तो सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी अनेक वेळा जनावरे रस्त्यांवर सोडली जातात. त्यामुळे अपघात शेतीचे नुकसान आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. या जनावरांचा योग्य तऱ्हेने संगोपन करण्यासाठी गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावी. आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरGovernmentसरकार