शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची होणार ‘ससून’मधून पडताळणी

By चंद्रकांत शेळके | Updated: May 30, 2023 16:10 IST

काही कर्मचाऱ्यांनी आपली पाल्य मतिमंद असल्याचे दाखवून बदलीत सूट घेतलेली आहे.

अहमदनगर - जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच संपली आहे. परंतु यात ज्या कर्मचाऱ्यांनी संवर्ग १मध्ये बदलीसाठी सवलत घेतली, त्या सर्वांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पुण्यातील ससून रूग्णालयातून पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व खातेप्रमुखांना दिल्या आहेत. त्यामुळे चुकीचे प्रमाणपत्र सादर करणारे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ८ ते १३ मे दरम्यान पार पडली. यादरम्यान सर्व विभागांच्या मिळून २६० बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याची शंका ‘लोकमत’ने उपस्थित केली होती. प्रत्यक्ष बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनीही कर्मचाऱ्यांना तंबी देत वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रांच्या आधारे बदलीत चुकीची सवलत घेतल्यास थेट बडतर्फ करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेने अनेक कर्मचाऱ्यांनी बदल्यांतून माघार घेतली. तरीही ४० हून अधिक कर्मचाऱ्यांनी संवर्ग १ ची सवलत बदलीत घेतली. 

दरम्यान, सीईओंच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने सर्व खातेप्रमुखांना पत्र काढून प्रमाणपत्र पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत. ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी किंवा दुर्धर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले आहे, ते प्रमाणपत्र पुण्यातील ससून रूग्णालयातून पडताळणी करून आणावे. तसेच विवधा, परितक्ता, घटस्फोटित महिलांनी त्यांनी जोडलेली कागदपत्रे, तसेच त्या खरच त्या वर्गातील आहेत का, याची पडताळणी ग्रामसेवकांमार्फत करावी. ग्रामपंचायत स्तरावर काही अडचण आल्यास ग्रामपंचाय विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नस्ती सादर करावी व तसे आदेश प्राप्त करून घ्यावेत. या सर्व प्रक्रियेत संबंधित कर्मचाऱ्यांनी चुकीची प्रमाणपत्रे अथवा चुकीची माहिती दिलेली असल्यास त्यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही तत्काळ प्रस्तावित करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने खातेप्रमुखांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

काहींनी पाल्यच दाखवली मतिमंद काही कर्मचाऱ्यांनी आपली पाल्य मतिमंद असल्याचे दाखवून बदलीत सूट घेतलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन खरंच ही मुले मतिमंद आहेत का? ती कोणत्या शाळेत जातात? हेही ग्रामसेवकांना तपासावे लागणार आहे. याशिवाय काहींनी घटस्फोटित नसतानाही तसे कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे ती खरंच घटस्फोटित आहेत की एकाच घरात राहतात, हेही चौकशीतून समोर येणार आहे.