शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची होणार ‘ससून’मधून पडताळणी

By चंद्रकांत शेळके | Updated: May 30, 2023 16:10 IST

काही कर्मचाऱ्यांनी आपली पाल्य मतिमंद असल्याचे दाखवून बदलीत सूट घेतलेली आहे.

अहमदनगर - जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच संपली आहे. परंतु यात ज्या कर्मचाऱ्यांनी संवर्ग १मध्ये बदलीसाठी सवलत घेतली, त्या सर्वांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पुण्यातील ससून रूग्णालयातून पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व खातेप्रमुखांना दिल्या आहेत. त्यामुळे चुकीचे प्रमाणपत्र सादर करणारे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ८ ते १३ मे दरम्यान पार पडली. यादरम्यान सर्व विभागांच्या मिळून २६० बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याची शंका ‘लोकमत’ने उपस्थित केली होती. प्रत्यक्ष बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनीही कर्मचाऱ्यांना तंबी देत वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रांच्या आधारे बदलीत चुकीची सवलत घेतल्यास थेट बडतर्फ करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेने अनेक कर्मचाऱ्यांनी बदल्यांतून माघार घेतली. तरीही ४० हून अधिक कर्मचाऱ्यांनी संवर्ग १ ची सवलत बदलीत घेतली. 

दरम्यान, सीईओंच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने सर्व खातेप्रमुखांना पत्र काढून प्रमाणपत्र पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत. ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी किंवा दुर्धर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले आहे, ते प्रमाणपत्र पुण्यातील ससून रूग्णालयातून पडताळणी करून आणावे. तसेच विवधा, परितक्ता, घटस्फोटित महिलांनी त्यांनी जोडलेली कागदपत्रे, तसेच त्या खरच त्या वर्गातील आहेत का, याची पडताळणी ग्रामसेवकांमार्फत करावी. ग्रामपंचायत स्तरावर काही अडचण आल्यास ग्रामपंचाय विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नस्ती सादर करावी व तसे आदेश प्राप्त करून घ्यावेत. या सर्व प्रक्रियेत संबंधित कर्मचाऱ्यांनी चुकीची प्रमाणपत्रे अथवा चुकीची माहिती दिलेली असल्यास त्यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही तत्काळ प्रस्तावित करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने खातेप्रमुखांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

काहींनी पाल्यच दाखवली मतिमंद काही कर्मचाऱ्यांनी आपली पाल्य मतिमंद असल्याचे दाखवून बदलीत सूट घेतलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन खरंच ही मुले मतिमंद आहेत का? ती कोणत्या शाळेत जातात? हेही ग्रामसेवकांना तपासावे लागणार आहे. याशिवाय काहींनी घटस्फोटित नसतानाही तसे कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे ती खरंच घटस्फोटित आहेत की एकाच घरात राहतात, हेही चौकशीतून समोर येणार आहे.