शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

पाठ्यपुस्तकात साहित्यमुल्य असणारेच पाठ हवेत - मुथा

By साहेबराव नरसाळे | Updated: June 9, 2019 13:25 IST

ज्येष्ठ साहित्यिक प्रा़ जवाहर मुथा यांच्याशी ‘मराठी वाचवा’ या लोकमतच्या अभियानाप्रसंगी साधलेला संवाद़़

साहेबराव नरसाळेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाची तीन वेळा निवडणूक लढविलेले आणि कथा, कादंबरी, संशोधन, कृषी, पर्यटन अशा विविध विषयांवर ३५ पुस्तके लिहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक प्रा़ जवाहर मुथा यांच्याशी ‘मराठी वाचवा’ या लोकमतच्या अभियानाप्रसंगी साधलेला संवाद़़मराठी भाषेचे अध:पतन होतेय का?मराठी भाषेचे अध:पतन होतेय, हे खरे आहे़ कारण त्याला महाराष्ट्र शासनाचे धोरण कारणीभूत आहे़ त्याशिवाय मराठी भाषेविषयी अनास्था असलेले लोकं मराठी भाषेविषयी चुकीचे निर्णय घेत आहेत़ याचे एक उदाहरण मी येथे सांगतो, ‘मी जेव्हा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मराठी शिकवीत होतो, तेव्हा १९७३-७४ साली त्याठिकाणी मराठी भाषा शिकविणे बंद झाले होते. त्यानंतर मी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार व मराठी विकास परिषद यांना पत्र लिहून मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती़ मराठी शिकविणे बंद करुन चालणार नाही, अशी रोकठोक भूमिका मी मांडली होती़ मराठी भाषा जर शिकवली गेली नाही तर शेतकऱ्यांच्या मुलांना अर्ज कसा करावा, हे सुद्धा माहिती पडणार नाही. मराठी भाषेचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकली पाहिजे़ त्यासाठी महाराष्ट्राने मराठी आमची अस्मिता अशी चळवळच उभी करुन सर्व ठिकाणी मराठी सक्तीची करायला हवी़पाठ्यपुस्तकांमधील मराठी साहित्यही मराठीच्या अध:पतनास कारणीभूत ठरतेय का?आज पाठ्यपुस्तकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे़ मराठी भाषा टिकवायची असेल तर पाठ्यपुस्तकांमधील साहित्य हे सहज, सुंदर आणि ओघवते असायला हवे़ त्याला ठसठसीत साहित्यमूल्य असावे़ दुर्दैवाने पाठ्यपुस्तकांमध्ये असलेल्याकविता, किंवा पाठ यांच्यामध्ये मराठी वाड:मयाच्या दृष्टिने काहीही मुल्य उरलेले दिसत नाही़महाराष्ट्रात मराठीची सक्ती असावी का?प्रश्नच नाही़ तरच मराठी टिकेल. प्रत्येक शाळेमध्ये मराठी हा विषय अपरिहार्य, सक्तीचा करणे अत्यंत आवश्यक आहे़ कारण पुढील काळात मराठी प्रमाण भाषेला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये, मग ती इंग्रजी माध्यमाची असो किंवा उर्दू माध्यमाची असो, मराठी विषय सक्तीचाच असावा, असे माझे स्पष्ट मत आहे़ दाक्षिणात्य राज्यांमध्ये ते होऊ शकते, उत्तरेकडील राज्य हिंदीची सक्तीची करतात तर महाराष्ट्राची मातृभाषा आणि महाराष्ट्राचा गौरव असलेली मराठी सक्तीची का नको?दर्जाहीन व प्रमाणभाषेचा अभाव असलेल्या साहित्यांची पाठ्यपुस्तकांमध्ये रेलचेल दिसते़ हे फार दुर्दैवाचे आहे़ मराठी भाषा विकास समितीने त्यासंबंधी निर्णय घेतले पाहिजे. मराठी भाषा टिकवायची असेल तर सहज सुंदर आणि प्रमाणभाषेतील साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये असायला हवे़ आज पाठ्यपुस्तकांमधील साहित्याचा दर्जा घसरला आहे़ त्याला निर्णय प्रक्रियेतील उदासिनता जबाबदार आहे़ - प्रा़ जवाहर मुथा, ज्येष्ठ साहित्यिक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर