शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकात साहित्यमुल्य असणारेच पाठ हवेत - मुथा

By साहेबराव नरसाळे | Updated: June 9, 2019 13:25 IST

ज्येष्ठ साहित्यिक प्रा़ जवाहर मुथा यांच्याशी ‘मराठी वाचवा’ या लोकमतच्या अभियानाप्रसंगी साधलेला संवाद़़

साहेबराव नरसाळेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाची तीन वेळा निवडणूक लढविलेले आणि कथा, कादंबरी, संशोधन, कृषी, पर्यटन अशा विविध विषयांवर ३५ पुस्तके लिहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक प्रा़ जवाहर मुथा यांच्याशी ‘मराठी वाचवा’ या लोकमतच्या अभियानाप्रसंगी साधलेला संवाद़़मराठी भाषेचे अध:पतन होतेय का?मराठी भाषेचे अध:पतन होतेय, हे खरे आहे़ कारण त्याला महाराष्ट्र शासनाचे धोरण कारणीभूत आहे़ त्याशिवाय मराठी भाषेविषयी अनास्था असलेले लोकं मराठी भाषेविषयी चुकीचे निर्णय घेत आहेत़ याचे एक उदाहरण मी येथे सांगतो, ‘मी जेव्हा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मराठी शिकवीत होतो, तेव्हा १९७३-७४ साली त्याठिकाणी मराठी भाषा शिकविणे बंद झाले होते. त्यानंतर मी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार व मराठी विकास परिषद यांना पत्र लिहून मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती़ मराठी शिकविणे बंद करुन चालणार नाही, अशी रोकठोक भूमिका मी मांडली होती़ मराठी भाषा जर शिकवली गेली नाही तर शेतकऱ्यांच्या मुलांना अर्ज कसा करावा, हे सुद्धा माहिती पडणार नाही. मराठी भाषेचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकली पाहिजे़ त्यासाठी महाराष्ट्राने मराठी आमची अस्मिता अशी चळवळच उभी करुन सर्व ठिकाणी मराठी सक्तीची करायला हवी़पाठ्यपुस्तकांमधील मराठी साहित्यही मराठीच्या अध:पतनास कारणीभूत ठरतेय का?आज पाठ्यपुस्तकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे़ मराठी भाषा टिकवायची असेल तर पाठ्यपुस्तकांमधील साहित्य हे सहज, सुंदर आणि ओघवते असायला हवे़ त्याला ठसठसीत साहित्यमूल्य असावे़ दुर्दैवाने पाठ्यपुस्तकांमध्ये असलेल्याकविता, किंवा पाठ यांच्यामध्ये मराठी वाड:मयाच्या दृष्टिने काहीही मुल्य उरलेले दिसत नाही़महाराष्ट्रात मराठीची सक्ती असावी का?प्रश्नच नाही़ तरच मराठी टिकेल. प्रत्येक शाळेमध्ये मराठी हा विषय अपरिहार्य, सक्तीचा करणे अत्यंत आवश्यक आहे़ कारण पुढील काळात मराठी प्रमाण भाषेला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये, मग ती इंग्रजी माध्यमाची असो किंवा उर्दू माध्यमाची असो, मराठी विषय सक्तीचाच असावा, असे माझे स्पष्ट मत आहे़ दाक्षिणात्य राज्यांमध्ये ते होऊ शकते, उत्तरेकडील राज्य हिंदीची सक्तीची करतात तर महाराष्ट्राची मातृभाषा आणि महाराष्ट्राचा गौरव असलेली मराठी सक्तीची का नको?दर्जाहीन व प्रमाणभाषेचा अभाव असलेल्या साहित्यांची पाठ्यपुस्तकांमध्ये रेलचेल दिसते़ हे फार दुर्दैवाचे आहे़ मराठी भाषा विकास समितीने त्यासंबंधी निर्णय घेतले पाहिजे. मराठी भाषा टिकवायची असेल तर सहज सुंदर आणि प्रमाणभाषेतील साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये असायला हवे़ आज पाठ्यपुस्तकांमधील साहित्याचा दर्जा घसरला आहे़ त्याला निर्णय प्रक्रियेतील उदासिनता जबाबदार आहे़ - प्रा़ जवाहर मुथा, ज्येष्ठ साहित्यिक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर