दहावीत पोरं हुशार!
By Admin | Updated: June 18, 2014 01:24 IST2014-06-18T00:50:03+5:302014-06-18T01:24:40+5:30
अशोक निंबाळकर, अहमदनगर पूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा
दहावीत पोरं हुशार!
अशोक निंबाळकर, अहमदनगर
पूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद देऊन जात. परीक्षेची काठिण्य पातळी तीच असतानाही आता टक्केवारीत भारंभार विद्यार्थी सहज नव्वदी पार करीत आहेत. यंदा राज्यातील तब्बल ६० टक्के मुलं ६० पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहेत.
दहावीचा मंगळवारी (दि.१७) दुपारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला. त्यावरून ही आकडेवारी समोर आली आहे. बेस्ट आॅफ फाईव्हमुळे ही टक्केवारी फुगली आहे. ही वस्तुस्थिती आहे. विशेष श्रेणी मिळवणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. अवघ्या ७.४३ टक्के विद्यार्थ्यांना ४५ टक्क््यांपेक्षा कमी गुण आहेत.
९० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांची संख्या ४० हजार ७९७ आहे.
८५ ते ९० टक्के मिळवणारे ६५ हजार ११७, ८० ते ८५मध्ये ९३ हजार ९६१, ७५ ते ८० मध्ये १ लाख २० हजार २१४, ७० ते ७५ मध्ये १ लाख ४५ हजार, ६५ ते ७० टक्क्यांमध्ये १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही आकडेवारी एकूण उत्तीर्णांच्या ४५ टक्के आहे.
२ लाख विद्यार्थ्यांची मॅट्रीक ‘वारी’
६० ते ६५ टक्क्यांमध्ये १४.४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची संख्या १ लाख ९७ हजार २१६ आहे. ४५ ते ६० टक्के गुण ३२.०३ टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले. या श्रेणीत सर्वाधिक ४ लाख ३८ हजार ४२५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ४५ टक्क्यांखाली गुण मिळवणाऱ्यांची संख्या अवघी ७.४३ टक्के आहे. त्यात १ लाख १ हजार ७६४ जणांचा समावेश आहे. एकीकडे पोरं हुशार झाल्याचे दिसत असले तरी १ लाख ८१ हजार ६८ जण नापास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा मॅट्रीकची ‘वारी’ करावी लागेल.