शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तेजगड : एक अविस्मरणीय अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 19:37 IST

तेजगड बडोदा शहरापासून ९० किमी अंतरावर असणारे छोटं गांव. इथे पद्मश्री डॉ.गणेश आणि त्यांची पत्नी डॉ.सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात.

सोमेश शिंदे, अहमदनगरतेजगड बडोदा शहरापासून ९० किमी अंतरावर असणारे छोटं गांव.  इथे पद्मश्री डॉ.गणेश आणि त्यांची पत्नी डॉ.सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात. ही संस्था गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात तेथील बोलीभाषांवर काम करते. अक्षर मानवच्या निमित्ताने तीन दिवस रहायचा योग आला.  भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोलीभाषांचे इथे संवर्धन आणि जतन आॅडिओ आणि पुस्तक स्वरूपात इथे करण्यात आले आहे. भारतातील बोलींवर आणि जिवंत व नष्ट होत चाललेल्या ७८० भाषांवर संशोधन करून लिहिलेला गणेश देवी यांचा पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे आॅफ इंडिया नावाचा ग्रंथ इ.स. २०१०मध्ये प्रसिद्ध झाला. डॉ. गणेश देवी यांना त्यांच्या साहितयातील आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीसाठी इ.स. २०१४ साली पद्मश्री प्रदान झाली. या बहुमोल कामाव्यतिरिक्त त्यांचं आदिवासींच्या उत्थानासाठीचं कार्यही तितकंच अमूल्य व क्रांतदर्शी असंच आहे.गणेश देवींनी इथे आदिवासींची अकादमी स्थापन केलीय. या अकादमीमध्ये भलंमोठं सुसज्ज ग्रंथालय आणि संग्रहालय उभं केलंय.संग्रहालयात आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित वस्तूंचं भांडारच देवींनी मांडून ठेवलंय. केवळ संग्रहालय म्हणून ते उभं केलेलं नसून आदिवासींचं सारं जगणंच त्यातून जिवंत झालेलं पाहायला मिळतं. विविध जंगली पशु-पक्षांचा आणि मोरांचा किलकिलाट, ईकडून-तिकडून बागडणारी वानरे आणि वाघासारख्या श्वापदांचे मुक्तपणे संचार असलेल्या या नयनरम्य वातावरणातील वास्तव्यामध्ये जगातील सर्व भौतिक सुख-सुविधांचा आपोआप विसर पडतो.या तीन दिवसांत गणेश देवींसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. यात अनौपचारिक बातचीत, आणि प्रत्येकाच्या पातळीवर येऊन संवाद साधण्याचं नैसर्गिक साधेपण देवींमध्ये जाणवलं. त्यांच्या पत्नी डॉ.सुरेखा देवी पण सोबत होत्या. या तीन दिवसांच्या संवादातून त्यांच्या व्यग्र दैनंदिनीची कल्पना आली. डॉ.गणेश देवी म्हणतात"आपल्या मातृभाषेखेरीज इतर भाषांकडे जास्त आपुलकीने पाहायला हवे. संवाद वाढायला हवा. सध्या विसंवाद जास्त आहे. सर्व भाषांचे संमेलन व्हायला हवे. भाषा संवादाचे एकमेव साधन आहे. भाषेशिवाय संवाद होऊ शकत नाही. भाषा असेल तर कुटुंब, गाव टिकू शकेल. भाषिक समानता वाढवणे आवश्यक आहे. चित्तविस्तार हे साहित्याचे लक्षण आहे. मराठीवर प्रेम हवेच, पण इतर भाषांवरही प्रेम करता यायला हवे."मराठी भाषेच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ज्ञानभाषा म्हणून मराठीचा विकास झाला आहे. त्यामुळे मराठीच्या भविष्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. जगात ज्या २५ भाषा राहतील, त्यामध्ये मराठी असेल. मराठीची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीच हातपाय हलवायचे नाहीत. इतर भाषांचा तिरस्कार केल्याने मराठीचा प्रसार होणार नाही. भाषेवर प्रेम केले तरच तिची वाढ होईल.पहिल्याच दिवशी त्यांनी जवळच असलेल्या तेजगडच्या टेकडीवर असलेली गुहा बघून घ्या, असं आम्हाला सुचवलं. मध्य प्रदेशमधलं भीमबेटका यांच्याइतकंच प्राचीन; पण तुलनेनं छोटी गुहाचित्रे या ठिकाणी आहेत. ही गुहाचित्रे बारा हजार वर्षांपूवीर्ची आहेत, हे निश्चित करण्यात आलं ते गणेश देवी यांनी पुढाकार घेऊन पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञांना इथं आणून दाखवल्यावरच! गुहाचित्रांच्या डेटिंगचं काम गणेश देवींनी केलंय, हेही समजलं. हि भित्तीचित्रे तिथल्या एका टेकडीवर आहेत.त्यामुळे एक छोटासा ट्रेकींगचा अनुभव पण घेता आला.दुसर्या दिवशी अकादमी मध्ये एक नाटक सादर करण्यात आले.आदिवासींबरोबरच छारानगर (गांधीनगर) इथल्या कंजारभाट जमातीसाठीही असंच काम देवींनी उभं केलंय. त्यातून ग्रंथालय, कौशल्यविकास आणि संगणक प्रशिक्षणही दिलं जातं. नाटक करू इच्छिणा-या तरुणांना प्रोत्साहन देऊन बुधन हा प्रयोग बसवला गेला. तो राष्ट्रीय पातळीवर गाजला. बुधन हा आदिवासी बंगालमध्ये पोलिसी अत्याचाराला बळी पडला होता हा नाट्य प्रयोग पाहताना आपसूकच दोन आसवं डोळ्यांतून टपकली.देवींच्या कामामुळे गेल्या पाच वर्षांत बचत गटांच्या माध्यमातून इथे सहा कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागलीय. आदिवासींमध्ये केवळ आत्मभानच आले असे नाही, तर थेट हातात पैसाही आल्याने दागिने सावकाराकडे जायचं काही प्रमाणात थांबलंय.आदिवासींच्या मुलांना शाळेत जायची संधी मिळत नाही. अशा १० ते १२ वयाच्या मुलांना निवडून त्यांना एक वर्ष मातृभाषेतून शिक्षण द्यायचं, नंतर त्यांना गुजरातीतून शिक्षण द्यायचं; ज्याद्वारे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल! हा प्रयोग देवींनी राबवला. तोही त्यांच्या आदिवासी अकादमीद्वारे आश्रमशाळेच्या माध्यमातूनच राबविण्यात येत आहे. गणेश देवी शोषितांना आत्मभान देण्याचं काम करताहेत, त्यांना स्वतंत्र करू पाहताहेत. हे केवळ सामाजिक वा सांस्कृतिक काम नाही, तर दीर्घकालीन राजकीय व्यवस्थाबदलाच्या दिशेने टाकलेले ते पाऊल आहे. म्हणूनच ते महत्त्वाचे आहे!या तीन दिवसांच्या अनुभवाने जगण्याचे एक नवीन भान दिले आहे खूप काही नवीन शिकलो आदिवासी जे की मूळ रहिवासी आहेत त्यांना जवळून पाहता आले .खूप नवीन मित्र मैत्रिणी मिळाले. जुन्याशी अजून वीण घट्ट झाली. अक्षर मानव आणि राजन सरांना त्यासाठी खूप धन्यवाद. समाज समृद्धी साठी त्यांनी उचलले हे पाऊल नक्कीच मोठया समुदायाला मार्गदर्शक ठरेल .

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र