समन्वयातून यशस्वी तोडगा

By Admin | Updated: June 16, 2014 00:09 IST2014-06-15T23:36:38+5:302014-06-16T00:09:48+5:30

अहमदनगर: नगर एमआयडीसी मधील इंडियन सिमलेस कंपनीतील कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या योग्य समन्वयातून यशस्वी तोडगा निघाला.

Successful solution through coordination | समन्वयातून यशस्वी तोडगा

समन्वयातून यशस्वी तोडगा

अहमदनगर: नगर एमआयडीसी मधील इंडियन सिमलेस कंपनीतील कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या योग्य समन्वयातून यशस्वी तोडगा निघाला. चर्चेतून प्रश्न सुटतो. परंतु कंपनी बंद पाडून कामगारांनी टोकाची भूमिका कधीही घेऊ नये, अशी भूमिका उद्योजक व कंपनी व्यवस्थापनाची असते. याचे उदाहरण म्हणजे इंडियन सिमलेसचा देता येईल.
कंपन्यांमधील बंद आणि तडजोडी, आता नित्याचेच होऊ लागले आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील बहुतांश मोठे उद्योग बंद आहेत. कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनातील वादातून कंपन्या बंद पडल्या आहेत़ कारखाने बंद करून उद्योजकांनी इतर शहरात धाव घेतली़ पोषक वातावरण असूनही कामगाराच्या प्रॉब्लेममुळे अनेकांनी येथून गाशा गुंडाळला़ त्यामुळे उभारीच्या काळातच येथील कारखान्यांचे बॉयलर थंडावले आणि एमआयडीसी ओस पडली़ त्याचा उद्योजकांपेक्षा कामगारांना मोठा फटका बसला़ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली़ हाताला काम राहिले नाही़ त्यामुळे अनेक कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले़
नवीन उद्योग येणे तर दूरच पण, उद्योग बंद पडण्याची परंपरा कायम आहे़ ही परंपरा खंडित करण्यासाठी शहरातून कुणीही प्रयत्न केला नाही़ बहुतांश कारखान्यात कामगारांचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत़ कामगार संघटनांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जरुर प्रयत्न करावेत़ मात्र टोकाची भूमिका घेऊ नये, असे उद्योजकांचे मत आहे़ चर्चेतूनच मार्ग निघू शकते. मात्र थेट कंपनी बंद करून कामगारांनी रस्त्यावर उतरणे, ही भूमिका योग्य नाही़ त्यामुळे कामगार व उद्योजकांतील संबंधच बिघडत असून, अतिरिक्त आर्थिक बोजा कंपनीवर पडत असतो.
कंपनीचे हितही कामगारांनी लक्षात घ्यायला हवे. इंडियन सिमलेस कंपनीने यशस्वी तडजोड करीत उत्पादन पुन्हा सुरू केले़ त्यामुळे बेकारीचे संकट टळले़ पण प्रत्येकवेळी बंद आणि पुन्हा तडजोडी करण्याची वेळ येत असेल तर नोकरी करायची कशासाठी? असा प्रश्न कामगारांनाही भेडसावत आहे.
व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे बनले आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीत कामगारांसह इतर अनेक प्रश्न आहेत़ यामुळे व्यवस्थापन-कामगार संघटना यांनी कंपनी बंदची भाषा बंद करण्यापेक्षा त्यातून चर्चेव्दारा मार्ग कसा निघेल, हे पाहणे सर्वांच्या हिताचे आहे.
इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी जो सामंजस्यातून तोडगा काढल्याने नगरच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना देणारा आहे. अशा प्रकारची भूमिका सर्वच कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांनी भविष्यात घेणे गरजेचे आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Successful solution through coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.