शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

 डिझेल भेसळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबन प्रकरणाची चौकशी करा; गृहमंत्र्यांना दिले निवदेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 11:40 IST

डिझेल भेसळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबन प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक मार्फत चौकशी करावी. याप्रकरणी त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवदेनाव्दारे केली आहे.

अहमदनगर : डिझेल भेसळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबन प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक मार्फत चौकशी करावी. याप्रकरणी त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवदेनाव्दारे केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपनिरीक्षक व कर्मचा-यांना याप्रकरणी निलंबित केलेला आहे. त्यामुळे भविष्यात अवैध व्यवसायाविरोधात नगर जिल्ह्यात कारवाई करण्याचे धाडस पोलीस अधिकारी कर्मचारी करणार नाही. त्यांना तर कारवाई केल्यानंतर वरिष्ठांकडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे अपेक्षित होते. परंतु तशी कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून झालेली नाही. उलट फिर्याद दाखल होण्यापूर्वीच त्यांची एकतर्फी गुरुवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत  चौकशी केली. घाईगडबडीत अहवाल तयार करुन अधिकारी, कर्मचा-यांना शिक्षा करण्यात येत आहे. त्यामुळे भेसळ डिझेल प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक होते. त्याची चौकशी अद्याप झालेली नाही. मात्र निलंबनाची कारवाई इतकी तत्काळ करण्यात आली. तेवढी तत्परता  मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी व त्याला गजाआड करण्यासाठी दाखवायला हवी होती. तशी दाखवलेली नाही,असे शेख यांनी म्हटले आहे.  

उलट कर्मचा-यांना भेसळ डिझेल प्रकरणाची गुप्त बातम्या कळल्याबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक राठोड यांना यांना कळवली होती. संपूर्ण प्रकरणाची कार्यवाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. जर हे कारवाई करण्यास दिरंगाई झाली असेल त्याला कारवाई प्रमुख जबाबदार असतो.  राठोड यांना याप्रकरणी जबाबदार धरण्यात आल्याचे दिसून आलेले नाही. पोलीस अधीक्षकांनी त्यांना जाब विचारला हवा होता. परंतु तसे झाले नाही. कर्मचाºयांच्या विरोधात कारवाई करणे सोपे असते. कारण त्यांचा राजकीय गॉडफादर नसतो. त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांच्यापुढे अन्याय सहन करण्याशिवाय पर्याय नसतो.  याप्रकरणी  केलेले निलंबनाची कारवाईमुळे कर्मचा-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली आहे. प्रामाणिक काम करणारे अधिकारी, कर्मचारी त्यामुळे खचले  आहत. बेकायदेशीर व्यवसाय करणा-यांविरोधात कारवाई करणाºया पोलिसांच्या पाठिशी शासन उभे आहे हे दाखवण्यासाठी आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक,  कर्मचा-यांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणीही शाकिर शेख यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी