शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

 डिझेल भेसळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबन प्रकरणाची चौकशी करा; गृहमंत्र्यांना दिले निवदेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 11:40 IST

डिझेल भेसळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबन प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक मार्फत चौकशी करावी. याप्रकरणी त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवदेनाव्दारे केली आहे.

अहमदनगर : डिझेल भेसळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबन प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक मार्फत चौकशी करावी. याप्रकरणी त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवदेनाव्दारे केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपनिरीक्षक व कर्मचा-यांना याप्रकरणी निलंबित केलेला आहे. त्यामुळे भविष्यात अवैध व्यवसायाविरोधात नगर जिल्ह्यात कारवाई करण्याचे धाडस पोलीस अधिकारी कर्मचारी करणार नाही. त्यांना तर कारवाई केल्यानंतर वरिष्ठांकडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे अपेक्षित होते. परंतु तशी कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून झालेली नाही. उलट फिर्याद दाखल होण्यापूर्वीच त्यांची एकतर्फी गुरुवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत  चौकशी केली. घाईगडबडीत अहवाल तयार करुन अधिकारी, कर्मचा-यांना शिक्षा करण्यात येत आहे. त्यामुळे भेसळ डिझेल प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक होते. त्याची चौकशी अद्याप झालेली नाही. मात्र निलंबनाची कारवाई इतकी तत्काळ करण्यात आली. तेवढी तत्परता  मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी व त्याला गजाआड करण्यासाठी दाखवायला हवी होती. तशी दाखवलेली नाही,असे शेख यांनी म्हटले आहे.  

उलट कर्मचा-यांना भेसळ डिझेल प्रकरणाची गुप्त बातम्या कळल्याबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक राठोड यांना यांना कळवली होती. संपूर्ण प्रकरणाची कार्यवाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. जर हे कारवाई करण्यास दिरंगाई झाली असेल त्याला कारवाई प्रमुख जबाबदार असतो.  राठोड यांना याप्रकरणी जबाबदार धरण्यात आल्याचे दिसून आलेले नाही. पोलीस अधीक्षकांनी त्यांना जाब विचारला हवा होता. परंतु तसे झाले नाही. कर्मचाºयांच्या विरोधात कारवाई करणे सोपे असते. कारण त्यांचा राजकीय गॉडफादर नसतो. त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांच्यापुढे अन्याय सहन करण्याशिवाय पर्याय नसतो.  याप्रकरणी  केलेले निलंबनाची कारवाईमुळे कर्मचा-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली आहे. प्रामाणिक काम करणारे अधिकारी, कर्मचारी त्यामुळे खचले  आहत. बेकायदेशीर व्यवसाय करणा-यांविरोधात कारवाई करणाºया पोलिसांच्या पाठिशी शासन उभे आहे हे दाखवण्यासाठी आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक,  कर्मचा-यांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणीही शाकिर शेख यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी