विद्यार्थ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: July 26, 2014 00:33 IST2014-07-25T23:26:38+5:302014-07-26T00:33:56+5:30
श्रीरामपूर: बेलापूरच्या जे. टी. एस. कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायला पुरेशी जागा नसल्याने विद्यार्थ्यांनी मैदानात ठिय्या आंदोलन केले.
विद्यार्थ्यांचा ठिय्या
श्रीरामपूर: बेलापूरच्या जे. टी. एस. कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायला पुरेशी जागा नसल्याने होणाऱ्या गैरसोयीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मैदानात ठिय्या आंदोलन केले.
वर्गात बसायला जागा नाही व फळ्यावरील सर्वांना व्यवस्थित दिसत नसल्याने विद्यार्थ्यांनी मोकळ्या मैदानात ठिय्या मारला. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने उपप्राचार्यांनी वर्गाची जागा बदलली. वर्गातील बऱ्याच मुला मुलींना बसण्यासाठी जागा नाही. जे वर्गात बसतात, त्यांनाही फळ्यावरील मजकूर व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य हेमंत गोरे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी विद्यार्थ्यांची तक्रार समजावून घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच ‘जास्त शहाणपणा केला तर दाखला देईल’, ‘पोलिसांना बोलावीन’ असा दम दिला. त्यांच्या दमबाजी व गैरसोयीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत आम्हाला आमचा वर्ग द्या, बसण्यासाठी जागा द्या, अशी मागणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जगदीश मुंडलिक, माजी उपसरपंच रवींद्र खटोड, अशोक गवते, अशोक पवार, अशोक प्रधान, प्रफुल्ल डावरे, शहरमंत्री सुमित बोरूडे यांनी उपप्राचार्य गोरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी करीत तसे निवेदन दिले. गोरे यांनी निवेदन स्वीकारून दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
(प्रतिनिधी)