शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

शेतातील टाकाऊ वस्तूंपासून शेवगाव येथील भारदे शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविले ‘व्हिनेगर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 20:48 IST

शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शेतातील टाकाऊ पदार्थांपासून कोळसा व वूड व्हिनेगर तयार केले आहे. त्यांच्या या प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अहमदनगर : शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शेतातील टाकाऊ पदार्थांपासून कोळसा व वूड व्हिनेगर तयार केले आहे. त्यांच्या या प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.बाळसाहेब भारदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी कोळसा व वूड व्हिनेगर तयार करण्याचा प्रकल्प केला. या प्रकल्पात आकाश शेळके, शिवराज धस, कृष्णा मालुरे, सुमित शेळके (सर्व इयत्ता ९ वी), अथर्व जोशी (इ. ७ वी) यांनी हा प्रकल्प बनविला आहे. त्यांना वर्गशिक्षक अभिषेक जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रकल्पाने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला असून, त्यांचा हा प्रकल्प गुजरातमध्ये होणा-या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडण्यात आला आहे. या यशाबद्दल भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, विश्वस्त हरिश भारदे, प्राचार्य गोरख बडे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.हा प्रकल्प तयार करताना विद्यार्थ्यांनी शेतातील उसाचे पाचरट, बाजरीच्या बनग्या, कपाशीचे खोड व मूळ, डाळिंबाचे काड्या, तूरीचे खोड व मूळ काँग्रेस गवत हे जाळून यापासून कोळसा तयार केला़ त्या कोळशापासून व्हिनेगार तयार केले आहे. विशेष म्हणजे शेतकºयांसाठी जैविक औषध म्हणून हे व्हिनेगार वापरता येणार आहे. रासायनिक औषधांमधील बहुतांश घटक या व्हिनेगरमध्ये आढळले असून, पुणे येथील सारथी लॅबमध्ये या व्हिनेगरची तपासणी करण्यात आली आहे. सारथी लॅबने या व्हिनेगरमध्ये असणारे घटक कोणते व त्यांचे प्रमाण किती याची माहिती या विद्यार्थ्यांना कळविली. तसेच औरंगाबाद येथील आर्या बायोटेक्नॉजी या कंपनीने या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे कौतुक करीत या प्रकल्पाचा वापर करुन व्हिनेगरची निर्मिती करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हिनेगरच्या काही शास्त्रोक्त चाचण्या करण्यात येणार आहेत.

शेतक-यांसाठी हा प्रकल्प फायदेशीर

शेतातील टाकाऊ वस्तूंपासून कोळसा व व्हिनेगर तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे़ शेतकरी घरीच कोळसा व व्हिनेगर तयार करु शकतात. त्यामुळे शेतक-यांना जैविक औषध उपलब्ध होणार असून, या कोळशाचा वापर करुन शेतकरी महिलांना धुरविरहित स्वयंपाक करता येणार आहे. शेतीला जोड व्यवसायही उपलब्ध होऊ शकेल. पीक कापणीनंतर टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावता येणार आहे. प्रदूषण नियंत्रणही साध्य होणार आहे. तसेच पिकांना जैविक औषध मिळाल्यास उत्पादक वाढून जमिन प्रदूषणाचे प्रमाणही घटणार आहे, असे या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रा. अभिषेक जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSchoolशाळा