शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील टाकाऊ वस्तूंपासून शेवगाव येथील भारदे शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविले ‘व्हिनेगर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 20:48 IST

शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शेतातील टाकाऊ पदार्थांपासून कोळसा व वूड व्हिनेगर तयार केले आहे. त्यांच्या या प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अहमदनगर : शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शेतातील टाकाऊ पदार्थांपासून कोळसा व वूड व्हिनेगर तयार केले आहे. त्यांच्या या प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.बाळसाहेब भारदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी कोळसा व वूड व्हिनेगर तयार करण्याचा प्रकल्प केला. या प्रकल्पात आकाश शेळके, शिवराज धस, कृष्णा मालुरे, सुमित शेळके (सर्व इयत्ता ९ वी), अथर्व जोशी (इ. ७ वी) यांनी हा प्रकल्प बनविला आहे. त्यांना वर्गशिक्षक अभिषेक जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रकल्पाने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला असून, त्यांचा हा प्रकल्प गुजरातमध्ये होणा-या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडण्यात आला आहे. या यशाबद्दल भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, विश्वस्त हरिश भारदे, प्राचार्य गोरख बडे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.हा प्रकल्प तयार करताना विद्यार्थ्यांनी शेतातील उसाचे पाचरट, बाजरीच्या बनग्या, कपाशीचे खोड व मूळ, डाळिंबाचे काड्या, तूरीचे खोड व मूळ काँग्रेस गवत हे जाळून यापासून कोळसा तयार केला़ त्या कोळशापासून व्हिनेगार तयार केले आहे. विशेष म्हणजे शेतकºयांसाठी जैविक औषध म्हणून हे व्हिनेगार वापरता येणार आहे. रासायनिक औषधांमधील बहुतांश घटक या व्हिनेगरमध्ये आढळले असून, पुणे येथील सारथी लॅबमध्ये या व्हिनेगरची तपासणी करण्यात आली आहे. सारथी लॅबने या व्हिनेगरमध्ये असणारे घटक कोणते व त्यांचे प्रमाण किती याची माहिती या विद्यार्थ्यांना कळविली. तसेच औरंगाबाद येथील आर्या बायोटेक्नॉजी या कंपनीने या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे कौतुक करीत या प्रकल्पाचा वापर करुन व्हिनेगरची निर्मिती करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हिनेगरच्या काही शास्त्रोक्त चाचण्या करण्यात येणार आहेत.

शेतक-यांसाठी हा प्रकल्प फायदेशीर

शेतातील टाकाऊ वस्तूंपासून कोळसा व व्हिनेगर तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे़ शेतकरी घरीच कोळसा व व्हिनेगर तयार करु शकतात. त्यामुळे शेतक-यांना जैविक औषध उपलब्ध होणार असून, या कोळशाचा वापर करुन शेतकरी महिलांना धुरविरहित स्वयंपाक करता येणार आहे. शेतीला जोड व्यवसायही उपलब्ध होऊ शकेल. पीक कापणीनंतर टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावता येणार आहे. प्रदूषण नियंत्रणही साध्य होणार आहे. तसेच पिकांना जैविक औषध मिळाल्यास उत्पादक वाढून जमिन प्रदूषणाचे प्रमाणही घटणार आहे, असे या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रा. अभिषेक जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSchoolशाळा