शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले नाहीतर राजकारणातून बाजूला व्हा; विखे-पाटलांचे थोरातांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 23:19 IST

दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : "तलाठी भरतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला असा आरोप करीत व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न झाला. पण, सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने पहिल्यांदाच तलाठी भरती इतक्या पारदर्शक पद्धतीने पार पडली. त्यामुळे माजी महसूलमंत्र्यांना आव्हान आहे की एकदा साईबाबांकडे या आणि बाबांच्या शपथेवर सांगा, भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा," असे जाहीर आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले.

अहमदनगर शहरातील सहकार सभागृहात शनिवारी (दि. ०३) महसूल विभागाकडून आयोजित कार्यक्रमात विखे-पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह नवीन नियुक्त तलाठी, पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी तलाठी भरती घोटाळ्यांवर माझ्यावर आरोप केले. त्यामध्ये माजी महसूलमंत्री आणि एक विद्यमान आमदार होते. त्यावेळी आम्ही विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला होता. परंतु, संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सर्व जिल्ह्यातील तलाठी उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना मोठी चपराक लागली आहे. याचे मला समाधान आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

माजी महसूलमंत्र्यांकडे तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या बदलीचे रेटकार्ड होते. आज पहिल्यांदा पारदर्शकपणे नियुक्त आणि अधिकाऱ्यांना बढती मिळाल्या आहेत. ज्यांच्या बुडाखाली अंधार, ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील