शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले नाहीतर राजकारणातून बाजूला व्हा; विखे-पाटलांचे थोरातांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 23:19 IST

दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : "तलाठी भरतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला असा आरोप करीत व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न झाला. पण, सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने पहिल्यांदाच तलाठी भरती इतक्या पारदर्शक पद्धतीने पार पडली. त्यामुळे माजी महसूलमंत्र्यांना आव्हान आहे की एकदा साईबाबांकडे या आणि बाबांच्या शपथेवर सांगा, भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा," असे जाहीर आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले.

अहमदनगर शहरातील सहकार सभागृहात शनिवारी (दि. ०३) महसूल विभागाकडून आयोजित कार्यक्रमात विखे-पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह नवीन नियुक्त तलाठी, पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी तलाठी भरती घोटाळ्यांवर माझ्यावर आरोप केले. त्यामध्ये माजी महसूलमंत्री आणि एक विद्यमान आमदार होते. त्यावेळी आम्ही विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला होता. परंतु, संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सर्व जिल्ह्यातील तलाठी उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना मोठी चपराक लागली आहे. याचे मला समाधान आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

माजी महसूलमंत्र्यांकडे तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या बदलीचे रेटकार्ड होते. आज पहिल्यांदा पारदर्शकपणे नियुक्त आणि अधिकाऱ्यांना बढती मिळाल्या आहेत. ज्यांच्या बुडाखाली अंधार, ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील