शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

अण्णांचे मन वळविण्यात राज्य सरकारला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:59 IST

अण्णा हजारे - महाजन भेट : आंदोलनाचा निर्णय पक्का; अण्णा दिल्लीकडे रवाना

ठळक मुद्देज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत.बुधवारी सकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौ-यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या पत्रांना उत्तरे देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असून बुधवारी सकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. परंतु अण्णा आपल्या निर्णयावर ठाम असून उद्या नियोजित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौ-यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या पत्रांना उत्तरे देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. आपण लोकांसाठी आंदोलन करीत आहे. हार्ट अ‍ॅटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं म्हणून उपोषण करणारच असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. शेतक-यांच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा, कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा द्यावा, शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांना किमान दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतक-यांचा पीक विमा सामूहिक न करता तो वैयक्तिक करावा, १९४९ बँक रेग्युलेशन अ‍ॅक्टनुसार पीक कर्जाला चक्रवाढ व्याज लावू नये, शेतमजुरांना उत्पादन सुरक्षा रोजगाराची हमी द्यावी, लोकपाल व लोकायुक्त यांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, निवडणूक सुधारणेत उमेदवाराच्या नावापुढे फोटो व चिन्ह काढून फोटोलाच चिन्हाची मान्यता द्यावी, राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, सरकारच्या वतीने मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. अण्णा आणि महाजन यांची चर्चा दोन तास चालली, परंतु त्यांना पुन्हा एकदा अण्णांचे मन वळविण्यात अपयश आले. यावेळी महाजन म्हणाले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत संपर्क चालू आहे. अण्णांच्या सर्व मागण्या या देशहिताच्या असून त्याचा देशातील सर्व जनतेला फायदाच होणार आहे. भेटीनंतर अण्णांच्या प्रमुख मागण्यांचे पत्र घेऊन मुंबईकडे महाजन रवाना झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजनParnerपारनेर