शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अण्णांचे मन वळविण्यात राज्य सरकारला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:59 IST

अण्णा हजारे - महाजन भेट : आंदोलनाचा निर्णय पक्का; अण्णा दिल्लीकडे रवाना

ठळक मुद्देज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत.बुधवारी सकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौ-यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या पत्रांना उत्तरे देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असून बुधवारी सकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. परंतु अण्णा आपल्या निर्णयावर ठाम असून उद्या नियोजित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौ-यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या पत्रांना उत्तरे देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. आपण लोकांसाठी आंदोलन करीत आहे. हार्ट अ‍ॅटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं म्हणून उपोषण करणारच असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. शेतक-यांच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा, कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा द्यावा, शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांना किमान दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतक-यांचा पीक विमा सामूहिक न करता तो वैयक्तिक करावा, १९४९ बँक रेग्युलेशन अ‍ॅक्टनुसार पीक कर्जाला चक्रवाढ व्याज लावू नये, शेतमजुरांना उत्पादन सुरक्षा रोजगाराची हमी द्यावी, लोकपाल व लोकायुक्त यांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, निवडणूक सुधारणेत उमेदवाराच्या नावापुढे फोटो व चिन्ह काढून फोटोलाच चिन्हाची मान्यता द्यावी, राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, सरकारच्या वतीने मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. अण्णा आणि महाजन यांची चर्चा दोन तास चालली, परंतु त्यांना पुन्हा एकदा अण्णांचे मन वळविण्यात अपयश आले. यावेळी महाजन म्हणाले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत संपर्क चालू आहे. अण्णांच्या सर्व मागण्या या देशहिताच्या असून त्याचा देशातील सर्व जनतेला फायदाच होणार आहे. भेटीनंतर अण्णांच्या प्रमुख मागण्यांचे पत्र घेऊन मुंबईकडे महाजन रवाना झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजनParnerपारनेर