शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत काहिशी वाढ, जानेवारीपासून मात्र टंचाईची शक्यता, भूजलचा अंदाज 

By चंद्रकांत शेळके | Updated: November 30, 2023 20:01 IST

यंदा पावसाळाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली.

अहमदनगर : यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत १६ टक्के घट नोंदवली गेली. मात्र सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत काहीशी वाढ झाल्याचे दिसते आहे. मात्र ही वाढ आभासी असून पुढील काही महिन्यात पाऊस न झाल्यास जानेवारीपासून पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तवला आहे.

यंदा पावसाळाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ४४८ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत ४०० मीमी एवढा म्हणजे १६ टक्के कमी पाऊस पडला. सरासरी पर्जन्यमानात घट आढळली असली तरी सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे निरीक्षण विहिरींतील पाण्याच्या पातळीत मात्र वाढ झालेली दिसते आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल पातळी निर्देशांक अहवालानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय २०२ निरीक्षण विहिरींच्या सप्टेंबरमधील भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यात जिल्ह्यात मागील पाच वर्षांतील सप्टेंबर महिन्याच्या पाणी पातळीच्या तुलनेत २०२३ च्या पाण्याच्या पातळीत केवळ अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांत ० ते १ मीटरपर्यंत वाढ दिसून आली आहे.

मात्र ही वाढ सप्टेंबरअखेरच्या पावसाची आहे. त्यामुळे पुढील काळात पाऊस झाला नाही तर जानेवारी २०२४ पासून जिल्ह्यात टंचाईची स्थिती सुरू होऊन उन्हाळ्यात ती तीव्र होणार आहे. त्यामुळे बहुतांश तालुक्यात टँकर सुरू करावे लागणार आहेत, असाही भूजल सर्वेक्षण विभागाचा अंदाज आहे.

जामखेड, पारनेरला १ ते २ मीटर वाढ सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ अखेरच्या स्थिर पाणी पातळीत केवळ अकोले तालुक्यात ०.५ मिमी घट झाली आहे. दुसरीकडे कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यांत ० ते १ मीटरपर्यंत वाढ झालेली आहे. जामखेड व पारनेर तालुक्यात हीच वाढ १ ते २ मीटरपर्यंत आहे.

पुढील दोन महिन्यांत अवकाळी पाऊस झाल्यास भूजल पातळीत आणखी वाढ होऊ शकते; अन्यथा परिसरात जानेवारीपासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका रब्बी पिकांना बसण्यासह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू शकते. प्रामुख्याने संगमनेर, पाथर्डी, पारनेर अशा तालुक्यांत टँकर सुरू होणार आहेत. सध्या येथे काही टँकर सुरू आहेत.

सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे भूजल पातळीत सध्या तरी वाढ दिसत आहे. मात्र ही आभासी वाढ आहे. पुढे पाऊस न झाल्यास जानेवारीपासून टंचाई जाणवू लागेल. उन्हाळ्यात ती आणखी तीव्र होईल.- अजिंक्य काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातWaterपाणी