शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भूजल पातळीत काहिशी वाढ, जानेवारीपासून मात्र टंचाईची शक्यता, भूजलचा अंदाज 

By चंद्रकांत शेळके | Updated: November 30, 2023 20:01 IST

यंदा पावसाळाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली.

अहमदनगर : यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत १६ टक्के घट नोंदवली गेली. मात्र सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत काहीशी वाढ झाल्याचे दिसते आहे. मात्र ही वाढ आभासी असून पुढील काही महिन्यात पाऊस न झाल्यास जानेवारीपासून पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तवला आहे.

यंदा पावसाळाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ४४८ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत ४०० मीमी एवढा म्हणजे १६ टक्के कमी पाऊस पडला. सरासरी पर्जन्यमानात घट आढळली असली तरी सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे निरीक्षण विहिरींतील पाण्याच्या पातळीत मात्र वाढ झालेली दिसते आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल पातळी निर्देशांक अहवालानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय २०२ निरीक्षण विहिरींच्या सप्टेंबरमधील भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यात जिल्ह्यात मागील पाच वर्षांतील सप्टेंबर महिन्याच्या पाणी पातळीच्या तुलनेत २०२३ च्या पाण्याच्या पातळीत केवळ अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांत ० ते १ मीटरपर्यंत वाढ दिसून आली आहे.

मात्र ही वाढ सप्टेंबरअखेरच्या पावसाची आहे. त्यामुळे पुढील काळात पाऊस झाला नाही तर जानेवारी २०२४ पासून जिल्ह्यात टंचाईची स्थिती सुरू होऊन उन्हाळ्यात ती तीव्र होणार आहे. त्यामुळे बहुतांश तालुक्यात टँकर सुरू करावे लागणार आहेत, असाही भूजल सर्वेक्षण विभागाचा अंदाज आहे.

जामखेड, पारनेरला १ ते २ मीटर वाढ सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ अखेरच्या स्थिर पाणी पातळीत केवळ अकोले तालुक्यात ०.५ मिमी घट झाली आहे. दुसरीकडे कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यांत ० ते १ मीटरपर्यंत वाढ झालेली आहे. जामखेड व पारनेर तालुक्यात हीच वाढ १ ते २ मीटरपर्यंत आहे.

पुढील दोन महिन्यांत अवकाळी पाऊस झाल्यास भूजल पातळीत आणखी वाढ होऊ शकते; अन्यथा परिसरात जानेवारीपासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका रब्बी पिकांना बसण्यासह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू शकते. प्रामुख्याने संगमनेर, पाथर्डी, पारनेर अशा तालुक्यांत टँकर सुरू होणार आहेत. सध्या येथे काही टँकर सुरू आहेत.

सप्टेंबरअखेर झालेल्या पावसामुळे भूजल पातळीत सध्या तरी वाढ दिसत आहे. मात्र ही आभासी वाढ आहे. पुढे पाऊस न झाल्यास जानेवारीपासून टंचाई जाणवू लागेल. उन्हाळ्यात ती आणखी तीव्र होईल.- अजिंक्य काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातWaterपाणी