शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस घटनास्थळी पोहोचला, पण...; तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 00:22 IST

सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो.

Ahilyanagar Murder: वैभव नायकोडी याच्या हत्येपूर्वी त्याला मारहाण झाल्याची माहिती एमआयडीसी वैभव नायकोडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला मिळाली होती. संबंधित कर्मचारी घटनास्थळी गेलाही होता. परंतु, आरोपींना न रोखता तो परत आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आता पोलिस अधीक्षकांनी चौकशी सुरु केली आहे.

सावेडी उपनगरात ढवण वस्ती येथे राहणाऱ्या वैभव शिवाजी नायकोडी (वय १९) याची २२ फेब्रुवारी रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. आरोपींनी मयत तरुणाचे सकाळी साडेआठ वाजता अपहरण केले होते. ही माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली होती. तो घटनास्थळी जाऊन परत आला. सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यातच विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. असे असताना एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरोपी ताब्यात असूनही छडा लागला नाहीआरोपींना २७ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान वैभव आमच्या तावडीतून पळून गेला. तो कुठे गेला हे माहिती नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती आरोपींनी दिली. त्यामुळे घटनेची उकल करण्यात अपयश आले.

हाडेही गायब केलीआरोपींनी मयताचे दहन केले. त्यानंतर त्याच्या हाडांचीसुद्धा विल्हेवाट लावली. पोलिसांनी राखेची अक्षरशः चाळणी करून हाडांचे बारीक अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी गोळा केले आहेत.

आईने केली होती तक्रारमयताच्या आईने २५ फेब्रुवारीला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रारीची दाखल घेतली नाही. त्यानंतर मयताच्या आईनेच पुन्हा २७ फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन आपल्या मुलाला लपका व त्याच्या साथीदारांनी कारमधून पळवून नेले, अशी तक्रार दिली. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी तपास हाती घेतला.

गुन्हे शाखेने केली उकलज्यांनी अपहरण केले त्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण ज्याचे अपहरण झाले तो वैभव मिळून आला नव्हता. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना संशय आला. त्यांनी दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले. त्यांनी घटनेचा उलगडा केला.

मयताला अमानुष मारहाणमयत नायकोडी याला अगोदर निर्जनस्थळी मारहाण करण्यात आली. नंतर नवनागापूर येथील चेतना कॉलनीत असलेल्या फ्लॅटवर मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह डोंगरात नेऊन जाळला. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस