शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेमाचे जाळे टाकून ११ महिन्यांत ४५४ अल्पवयीन मुलींना पळवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:06 IST

प्रेमाचे आमिष दाखवून पाचवी ते दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

अण्णा नवथर, अहिल्यानगर : गेल्या ११ महिन्यांत शहरासह ग्रामीण भागातून ४५४ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक १४ ते १७ वयोगटातील मुलींचा समावेश आहे. तसेच ८२ अल्पवयीन मुलेही घरातून गायब झाली असून, ६७ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. जराशी समज येण्याच्या वयातच प्रेमाचे आमिष दाखवून पाचवी ते दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची दररोज एक तरी तक्रार दाखल होते. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक पोलिस ठाणे गाठतात. न्यायालयाच्या आदेशानुसार मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करून घेतली जाते. मुलीचा शोध घेतला असता ती मित्रासोबत, शेजाऱ्यासोबत, ओळखीच्या व्यक्तीसोबत पळवून गेल्याचे समोर येते. मुलीचा शोध लागल्यानंतर नातेवाईक संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. पोलिसांना अशा प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो. परंतु काही प्रकरणांत मुलगाही अल्वयीन असतो. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होतो. अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन तिला पोलिस ठाण्यात आणले जाते. मात्र, काही मुली नातेवाइकांसोबत जाण्यास सपशेल नकार देतात. काही प्रकरणांत पळवून नेलेल्या मुली १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत घरी येत नाहीत. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर थेट लग्न करूनच घरी येतात. नातेवाइकांनी स्वीकारल्यास थांबतात नाही तर स्वतंत्रपणे राहणे पसंत करतात. अशाही घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये मुलींच्या पालकांना त्रास सहन करावा लागतो.

पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान सुरू 

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील हरवलेले, पळवून नेलेले मुली, मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान ऑपरेशन मुस्कान राबविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार मुले व मुलींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारी