शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पक्षाच्या आमदारांनीच संपवली शिवसेना; 'त्या' नगरसेवकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 12:40 IST

औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले. मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत.

अहमदनगर : शिवसेनेच्या जोरावर विजय औटी हे आमदार झाले, विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. मात्र, त्यांनी शिवसैनिकांना कधीच किंमत दिली नाही. सेनेची एकही शाखा त्यांनी उघडू दिली नाही. शिवसैनिकांऐवजी त्यांनी काँग्रेस व कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांना जवळ केले. त्यामुळे त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करा व शिवसेना वाचवा, अशा आशयाचे पत्र पारनेर नगरपंचायतीच्या त्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

पारनेरमधील डॉ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे नाराजी नोंदविताच हे नगरसेवक परत सेनेत आले. मातोश्रीवर या नगरसेवकांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा सेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांना एक पत्र दिले असून त्यात पारनेरचे सेनेचे माजी आमदार औटी यांच्याबद्दल तक्रार केली आहे. 

 औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले. मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत.

सेनाप्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी साधे दर्शनाला आले नाहीत. आपण मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा साधा फलक लावला नाही. पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांना औटी यांनी तालुक्यात येऊ दिले नाही. आलेच तर शिवसैनिकांशी संपर्क होऊ दिला नाही. त्यांचे सर्व राजकारण हे स्वार्थी होते. 

निलेश लंके हे सेनेत असताना पक्षसंघटन वाढवत होते. मात्र, त्यांनाही औटी यांनी त्रास दिला. लंके यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केली असे खोटे चित्र रंगवत त्यांचे तालुकाप्रमुखपद व पक्षातून काढले. मात्र, औटी हेच पक्ष संपवत असून त्यांना शिवसेनेतून काढा अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक राहणार नाही, असा धोका या नगरसेवकांनी पत्रात व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे