शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेक्सपिअरच्या देशातील कवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:52 IST

शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे.

अहमदनगर : ‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे. या पुस्तकात त्यांनी आद्यकवी जेफ्री चॉसरपासून एलिझाबेदन आणि व्हिक्टोरियन कालखंडातील कवी ते अलीकडच्या काळातील डिलन थॉमसपर्यंत एकवीस कवींच्या आयुष्याचा सखोल मागोवा घेतला आहे. हे कवी व्यक्तिगत आयुष्य कसे जगले, हे या पुस्तकातून रंजकपणे सामोरे येते.एखाद्या साहित्यिकाचे साहित्य समजून घ्यायचे असेल तर जीवनानुभवातून त्याचं घडत गेलेलं व्यक्तिमत्त्व त्याच्या साहित्यात कशा प्रकारे प्रतिबिंबित झालं आहे याचा उलगडा होऊ शकतो. इंग्रजी साहित्यातील आद्यकवी जेफ्री चॉसरपासून सुरुवात केल्यामुळे या ग्रंथाचा आवाका मोठा झाला आहे. हे सगळे कवी इंग्रजी साहित्यातील अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वं आहेत. त्यांनी फक्त कविताच केल्या नाहीत तर साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये उत्तुंग भराऱ्या मारल्या आहेत. मुळात ज्याच्या नावातून या पुस्तकाने आकार घेतला आहे, तो शेक्सपिअर हा जसा जगज्जेता नाटककार म्हणून सगळ्यांना माहीत आहे; तसा कवी म्हणून तितकासा परिचित नाही. लेखकाने शेक्सपिअरच्या काव्याचापरिचय करून देताना त्याचा संघर्षमय जीवनप्रवास अत्यंत अप्रतिमरीत्या रेखाटला आहे.प्रत्येक कवी वाचताना लेखकाने त्या कवीवर कुणाचा प्रभाव होता, त्याचे मित्र कोण होते आणि त्यांचा त्याच्यावर काय परिणाम झाला हेदेखील सांगितले आहे, त्यामुळे हे पुस्तक रंजक झाले आहे.प्रत्येक कवीचा जन्मापासून ते वेस्टमिनिस्टर अ‍ॅबेच्या दफनभूमीपर्यंतचा प्रवास हा वाचकाचे हृदय हेलावणारा आहे. सर वॉल्टर रॅलेला मृत्युदंडाची शिक्षा देऊन त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं. सर फिलीप सिडनी रणभूमीवर गोळी लागून जखमी होऊन जगाचा निरोप घेतो.शेक्सपिअर वाढदिवसाच्या दिवशीच शांतपणे जगाचा निरोप घेताना मनाला चटका लावून जातो. बेन जॉन्सन आणि कोलरिज एकाकीपणात हे जग सोडतात. शेलेचा मृत्यू प्रवासादरम्यान नौका वादळात उलटून बुडून झाला. लॉर्ड बायरन ब्लडलेटिंगमुळे आजारी पडला आणि त्यानंतर संसर्ग होऊन मरण पावला. जॉन कीट्सचा ऐन पंचविशीत क्षयाने झुरत झुरत एकाकीपणे रोममध्ये अंतझाला.या सगळ्या कवीचं आयुष्य समजावून सांगताना लेखकाने पुस्तकात मराठी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी काव्यातील असंख्य अवतरणांची उधळण केली आहे. या सगळ्या कवीचं वादळी आयुष्य वाचताना वाचक अवाक् झाल्याशिवाय राहत नाही. बालपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची वैयक्तिक आयुष्यं, त्यांच्या मनातील भीती व आनंदाचे क्षण या साºयांचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात कसे प्रतिबिंबित झालेले आहे, याचा अचूक वेध लेखकाने घेतला आहे.कवींचे वैयक्तिक जीवन व त्यांची प्रेमप्रकरणे वाचताना तर आपण अक्षरश: चक्रावूनजातो.सुरुवातीला हे पुस्तक हातात घेतल्यावर असं वाटतं, की हे इंग्रजी कवितेवरील एखादं क्लिष्ट पुस्तक असेल. परंतु लेखकाने या कवींच्या जीवनकथा इतक्या रंजकपणे सांगितल्या आहेत, की हे पुस्तक वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतं.हे पुस्तक वाचताना अंगावर नक्कीच रोमांच उभे राहतात आणि आपण एक नव्या दृष्टीने आपल्या आजूबाजूचा भवताल न्याहाळू लागतो. त्यामुळे हे पुस्तक संग्रहणीय झाले आहे.गणेश खंडाळे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर