शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

शेक्सपिअरच्या देशातील कवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:52 IST

शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे.

अहमदनगर : ‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे. या पुस्तकात त्यांनी आद्यकवी जेफ्री चॉसरपासून एलिझाबेदन आणि व्हिक्टोरियन कालखंडातील कवी ते अलीकडच्या काळातील डिलन थॉमसपर्यंत एकवीस कवींच्या आयुष्याचा सखोल मागोवा घेतला आहे. हे कवी व्यक्तिगत आयुष्य कसे जगले, हे या पुस्तकातून रंजकपणे सामोरे येते.एखाद्या साहित्यिकाचे साहित्य समजून घ्यायचे असेल तर जीवनानुभवातून त्याचं घडत गेलेलं व्यक्तिमत्त्व त्याच्या साहित्यात कशा प्रकारे प्रतिबिंबित झालं आहे याचा उलगडा होऊ शकतो. इंग्रजी साहित्यातील आद्यकवी जेफ्री चॉसरपासून सुरुवात केल्यामुळे या ग्रंथाचा आवाका मोठा झाला आहे. हे सगळे कवी इंग्रजी साहित्यातील अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वं आहेत. त्यांनी फक्त कविताच केल्या नाहीत तर साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये उत्तुंग भराऱ्या मारल्या आहेत. मुळात ज्याच्या नावातून या पुस्तकाने आकार घेतला आहे, तो शेक्सपिअर हा जसा जगज्जेता नाटककार म्हणून सगळ्यांना माहीत आहे; तसा कवी म्हणून तितकासा परिचित नाही. लेखकाने शेक्सपिअरच्या काव्याचापरिचय करून देताना त्याचा संघर्षमय जीवनप्रवास अत्यंत अप्रतिमरीत्या रेखाटला आहे.प्रत्येक कवी वाचताना लेखकाने त्या कवीवर कुणाचा प्रभाव होता, त्याचे मित्र कोण होते आणि त्यांचा त्याच्यावर काय परिणाम झाला हेदेखील सांगितले आहे, त्यामुळे हे पुस्तक रंजक झाले आहे.प्रत्येक कवीचा जन्मापासून ते वेस्टमिनिस्टर अ‍ॅबेच्या दफनभूमीपर्यंतचा प्रवास हा वाचकाचे हृदय हेलावणारा आहे. सर वॉल्टर रॅलेला मृत्युदंडाची शिक्षा देऊन त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं. सर फिलीप सिडनी रणभूमीवर गोळी लागून जखमी होऊन जगाचा निरोप घेतो.शेक्सपिअर वाढदिवसाच्या दिवशीच शांतपणे जगाचा निरोप घेताना मनाला चटका लावून जातो. बेन जॉन्सन आणि कोलरिज एकाकीपणात हे जग सोडतात. शेलेचा मृत्यू प्रवासादरम्यान नौका वादळात उलटून बुडून झाला. लॉर्ड बायरन ब्लडलेटिंगमुळे आजारी पडला आणि त्यानंतर संसर्ग होऊन मरण पावला. जॉन कीट्सचा ऐन पंचविशीत क्षयाने झुरत झुरत एकाकीपणे रोममध्ये अंतझाला.या सगळ्या कवीचं आयुष्य समजावून सांगताना लेखकाने पुस्तकात मराठी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी काव्यातील असंख्य अवतरणांची उधळण केली आहे. या सगळ्या कवीचं वादळी आयुष्य वाचताना वाचक अवाक् झाल्याशिवाय राहत नाही. बालपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची वैयक्तिक आयुष्यं, त्यांच्या मनातील भीती व आनंदाचे क्षण या साºयांचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात कसे प्रतिबिंबित झालेले आहे, याचा अचूक वेध लेखकाने घेतला आहे.कवींचे वैयक्तिक जीवन व त्यांची प्रेमप्रकरणे वाचताना तर आपण अक्षरश: चक्रावूनजातो.सुरुवातीला हे पुस्तक हातात घेतल्यावर असं वाटतं, की हे इंग्रजी कवितेवरील एखादं क्लिष्ट पुस्तक असेल. परंतु लेखकाने या कवींच्या जीवनकथा इतक्या रंजकपणे सांगितल्या आहेत, की हे पुस्तक वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतं.हे पुस्तक वाचताना अंगावर नक्कीच रोमांच उभे राहतात आणि आपण एक नव्या दृष्टीने आपल्या आजूबाजूचा भवताल न्याहाळू लागतो. त्यामुळे हे पुस्तक संग्रहणीय झाले आहे.गणेश खंडाळे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर