शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
5
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
6
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
7
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
8
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
9
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
10
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
11
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
12
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
13
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
14
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
15
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
16
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
17
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
18
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
19
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
20
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
Daily Top 2Weekly Top 5

शेक्सपिअरच्या देशातील कवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:52 IST

शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे.

अहमदनगर : ‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक इंग्लंडमधील कवींना समर्पित आहे. या पुस्तकात त्यांनी आद्यकवी जेफ्री चॉसरपासून एलिझाबेदन आणि व्हिक्टोरियन कालखंडातील कवी ते अलीकडच्या काळातील डिलन थॉमसपर्यंत एकवीस कवींच्या आयुष्याचा सखोल मागोवा घेतला आहे. हे कवी व्यक्तिगत आयुष्य कसे जगले, हे या पुस्तकातून रंजकपणे सामोरे येते.एखाद्या साहित्यिकाचे साहित्य समजून घ्यायचे असेल तर जीवनानुभवातून त्याचं घडत गेलेलं व्यक्तिमत्त्व त्याच्या साहित्यात कशा प्रकारे प्रतिबिंबित झालं आहे याचा उलगडा होऊ शकतो. इंग्रजी साहित्यातील आद्यकवी जेफ्री चॉसरपासून सुरुवात केल्यामुळे या ग्रंथाचा आवाका मोठा झाला आहे. हे सगळे कवी इंग्रजी साहित्यातील अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वं आहेत. त्यांनी फक्त कविताच केल्या नाहीत तर साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये उत्तुंग भराऱ्या मारल्या आहेत. मुळात ज्याच्या नावातून या पुस्तकाने आकार घेतला आहे, तो शेक्सपिअर हा जसा जगज्जेता नाटककार म्हणून सगळ्यांना माहीत आहे; तसा कवी म्हणून तितकासा परिचित नाही. लेखकाने शेक्सपिअरच्या काव्याचापरिचय करून देताना त्याचा संघर्षमय जीवनप्रवास अत्यंत अप्रतिमरीत्या रेखाटला आहे.प्रत्येक कवी वाचताना लेखकाने त्या कवीवर कुणाचा प्रभाव होता, त्याचे मित्र कोण होते आणि त्यांचा त्याच्यावर काय परिणाम झाला हेदेखील सांगितले आहे, त्यामुळे हे पुस्तक रंजक झाले आहे.प्रत्येक कवीचा जन्मापासून ते वेस्टमिनिस्टर अ‍ॅबेच्या दफनभूमीपर्यंतचा प्रवास हा वाचकाचे हृदय हेलावणारा आहे. सर वॉल्टर रॅलेला मृत्युदंडाची शिक्षा देऊन त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं. सर फिलीप सिडनी रणभूमीवर गोळी लागून जखमी होऊन जगाचा निरोप घेतो.शेक्सपिअर वाढदिवसाच्या दिवशीच शांतपणे जगाचा निरोप घेताना मनाला चटका लावून जातो. बेन जॉन्सन आणि कोलरिज एकाकीपणात हे जग सोडतात. शेलेचा मृत्यू प्रवासादरम्यान नौका वादळात उलटून बुडून झाला. लॉर्ड बायरन ब्लडलेटिंगमुळे आजारी पडला आणि त्यानंतर संसर्ग होऊन मरण पावला. जॉन कीट्सचा ऐन पंचविशीत क्षयाने झुरत झुरत एकाकीपणे रोममध्ये अंतझाला.या सगळ्या कवीचं आयुष्य समजावून सांगताना लेखकाने पुस्तकात मराठी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी काव्यातील असंख्य अवतरणांची उधळण केली आहे. या सगळ्या कवीचं वादळी आयुष्य वाचताना वाचक अवाक् झाल्याशिवाय राहत नाही. बालपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची वैयक्तिक आयुष्यं, त्यांच्या मनातील भीती व आनंदाचे क्षण या साºयांचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात कसे प्रतिबिंबित झालेले आहे, याचा अचूक वेध लेखकाने घेतला आहे.कवींचे वैयक्तिक जीवन व त्यांची प्रेमप्रकरणे वाचताना तर आपण अक्षरश: चक्रावूनजातो.सुरुवातीला हे पुस्तक हातात घेतल्यावर असं वाटतं, की हे इंग्रजी कवितेवरील एखादं क्लिष्ट पुस्तक असेल. परंतु लेखकाने या कवींच्या जीवनकथा इतक्या रंजकपणे सांगितल्या आहेत, की हे पुस्तक वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतं.हे पुस्तक वाचताना अंगावर नक्कीच रोमांच उभे राहतात आणि आपण एक नव्या दृष्टीने आपल्या आजूबाजूचा भवताल न्याहाळू लागतो. त्यामुळे हे पुस्तक संग्रहणीय झाले आहे.गणेश खंडाळे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर