बियाण्याचा तुटवडा

By Admin | Updated: June 11, 2014 00:17 IST2014-06-10T23:35:43+5:302014-06-11T00:17:05+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात बाजरी आणि कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे़ त्याखालोखाल म्हणजेच ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबिन पिकाखाली आहे़

Scarcity of seeds | बियाण्याचा तुटवडा

बियाण्याचा तुटवडा

अहमदनगर : जिल्ह्यात बाजरी आणि कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे़ त्याखालोखाल म्हणजेच ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबिन पिकाखाली आहे़ मात्र, यंदा सोयाबिन बियाण्यांचा मोठा तुटवडा भासणार असून, त्यामुळे सोयाबिनच्या क्षेत्रातही मोठी घट येणार आहे़
कृषी विभागाच्या नियोजनानुसार क्षेत्राचा विचार केल्यास साडे चार लाख किलो सोयाबिनचे बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे़ पेरणीतील अंदाजित तफावत लक्षात घेऊन कृषी विभागाने या वर्षी सुमारे ७० हजार ९५० क्ंिवटल सोयाबिन बियाण्याची मागणी नोंदविली होती़ त्यापैकी खाजगी कंपन्या व शेतकऱ्यांकडील ४० हजार ९५० क्विंटल बियाणे गृहित धरण्यात आले होते़ तर सरकारच्या महाबिज कंपनीकडून ३० हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणी कृषी विभागाने नोंदविली होती़ मात्र, आत्तापर्यंत अवघे ७ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे़ एक हेक्टरला सरासरी ७५ किलो बियाणे लागते, असे गृहित धरले जाते़ त्यानुसार बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली होती़ मात्र, मागणीच्या तुलनेत अत्यल्प बियाणे उपलब्ध झाले आहे़
(प्रतिनिधी)
अशी तपासावी उगवण क्षमता
शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे पेरणी करताना त्याची उगवण क्षमता तपासण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे़ उगवण क्षमता तपासण्यासाठी एक ग्लासभर पाण्यात मूठभर सोयाबिन टाकावे़ सुमारे १५ मिनिटे हे बियाणे पाण्यात ठेवावे़ १५ मिनिटानंतर फुगलेले सोयाबिन बाजूला काढावेत व सुरकुत्या पडलेले बियाणे पेरणीयोग्य समजावेत़ अशा पद्धतीने पूर्ण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे शेतकऱ्यांना पेरता येईल, असे माने यांनी सांगितले़
काळाबाजार रोखणार कसा
सोयाबिनचे अवघे ७ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे़ तर सोयाबिनचे पीक घेणारे शेतकरी मोठ्या संख्येने आहेत़ त्यामुळे सोयाबिनचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागणार आहे़ त्यामुळे सोयाबिन बियाणे विक्रीत मोठा काळाबाजार होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे़
घरचे बियाणे पेरा
सोयाबिनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण होईल, अशी शक्यता कृषी विभागाने गेल्या वर्षीच वर्तविली होती़ त्यामुळे गेल्या वर्षी सोयाबिनचे पीक हाती आल्यानंतर कृष्ीा विभागाने सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते़ जपून ठेवलेले सोयाबिन पेरण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुशराव माने यांनी केले आहे़

Web Title: Scarcity of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.