शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

‘त्या’ शेतकऱ्याच्या खात्यावर १,४०० ऐवजी जमा झाले ३० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 07:36 IST

केलवड येथील सावळाराम गमे यांच्या २ हेक्टर ६१ गुंठे या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते.

- नितीन गमे   राहाता (जि. अहमदनगर) : शेतकऱ्याच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने प्रतिगुंठा ५ रुपयांप्रमाणे १४०६ रुपयांची रक्कम जमा केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल विमा कंपनीने घेतली त्या शेतकऱ्याच्या खात्यावर आता ३० हजार रुपये जमा झाले आहेत. ‘लोकमत’मुळे न्याय मिळाल्याची भावना शेतकरी सावळाराम गमे यांनी व्यक्त केली आहे. 

केलवड येथील सावळाराम गमे यांच्या २ हेक्टर ६१ गुंठे या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी गमे यांना अवघे १४०० रुपये मिळाले होते. त्यानंतर ‘८० रु. विमा, ५ रुपये जमा, काय थट्टा लावली राव ! अशी बातमी २ नोव्हेंबर २०२२ च्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पुणे कृषी आयुक्तालय, नगर कृषी अधीक्षक कार्यालय यांनीच थेट दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून इन्शुरन्स कंपनीला पत्र दिले होते. यात ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देऊन शेतकऱ्याची थट्टा केल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. गमे यांच्या खात्यात विमा कंपनीने फक्त ५ रु. प्रति गुंठ्याप्रमाणे १४०० रु. जमा केले होते. आता गमे यांच्या खात्यावर ३० हजार रुपये जमा झाले आहेत.

बातमीनंतर दिले ४.३६ काेटी 

राहाता तालुक्यातील १५ हजार ४१० शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. यामध्ये ८ हजार ५०० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे कंपनीस तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात ७ हजार ८५ शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात २ कोटी ३६ लाख जमा झाले होते; परंतु ‘लोकमत’ने गमे यांच्याबाबतची बातमी प्रसिद्ध करताच कंपनीने इतर शेतकऱ्यांच्याबाबतही संवेदनशीलता दाखवली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या खात्यातही ४ कोटी ३० लाखांचा दुसरा हप्ता वर्ग झाला. आतापर्यंत तालुक्यातील ६ कोटी ६६ लाख रुपये विमा कंपनीकडून जमा करण्यात आले आहेत.

ज्यांना शून्य रक्कम, त्यांनाही होणार लाभ 

कंपनीस तक्रार करणाऱ्या सरासरी १३०० ते १५०० शेतकऱ्यांना अजून काहीही रक्कम जमा झालेली नाही. अशा शेतकऱ्यांना १५ जानेवारीच्या आत रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

टॅग्स :Farmerशेतकरी