समृद्ध गाव योजना चांगल्या पद्धतीने राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:34+5:302021-01-25T04:21:34+5:30
यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि. २२) पाणी फाउंडेशनच्यावतीने नव्याने निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांकरता एक दिवसीय कार्यशाळेचे ...

समृद्ध गाव योजना चांगल्या पद्धतीने राबवावी
यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि. २२) पाणी फाउंडेशनच्यावतीने नव्याने निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांकरता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक विक्रम फाटक, संदेश कारंडे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, जलमित्र, गावकरी, शासकीय ग्रामसेवक, कृषी सहाय्यक सीसी जनसेवक अशा १०२ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
डॉ. मंगरुळे म्हणाले, पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून पाणी अधिक जमिनीमध्ये मुरविल्याने त्या गावात समृद्धी येते. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर झालेले काम हे संपूर्ण देशासाठी अनुकरणीय असून आता प्रत्येक गावोगावी हे काम अधिक चांगले जर झाले तर गावे समृद्ध होतील. गाव समृद्ध झाला तर राज्य समृद्ध होईल म्हणून नवनिर्वाचित सदस्यांसाठी ही एक चांगली संधी असून प्रत्येकाने अधिक सक्रियतेने काम करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
फोटो -२४संगमनेर कार्यशाळा
..
ओळी- पाणी फाउंडेशनच्यावतीने ग्रामपंचायत सदस्यांकरता आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे.