शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील जमिनींची लिथीयम उत्पादसाठी विक्री; उध्दव ठाकरेंचा आरोप 

By शिवाजी पवार | Updated: May 10, 2024 16:20 IST

शिर्डीतील महाआघाडीच्या उमेदवाराची प्रचार सभा.

शिवाजी पवार , श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्ष पाहिले तर काश्मीरमध्ये अदानी यांना लिथीयम उत्पादनासाठी जमिनींची विक्री करण्यात आली, असा आरोपी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

 शिर्डी मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी रात्री येथील थत्ते मैदानावर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार नितीन देशमुख, आमदार सुनील शिंदे, आमदार लहू कानडे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ३७० कलम हटवले हा खोटा प्रचार आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यांचे प्रश्न कायम आहेत. पंतप्रधान मोदी हे तेलंगणात जाऊन माझ्यावर नकली संतान असल्याची टीका करत आहेत. माझ्या देवताससमान आई वडिलांचा त्यांनी अपमान केला आहे. हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. 

भाजप चारशे पारचा नारा देत आहेत. त्यांचे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. ज्यांनी तुकारामांची गाथा बुडविली तेच लोक संविधान बदलण्याचे बोलत आहेत. आमचे हिंदुत्व हे चुली पेटवणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे आहे, असे ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याचे सांगितले. केंद्र व भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४