शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील जमिनींची लिथीयम उत्पादसाठी विक्री; उध्दव ठाकरेंचा आरोप 

By शिवाजी पवार | Updated: May 10, 2024 16:20 IST

शिर्डीतील महाआघाडीच्या उमेदवाराची प्रचार सभा.

शिवाजी पवार , श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्ष पाहिले तर काश्मीरमध्ये अदानी यांना लिथीयम उत्पादनासाठी जमिनींची विक्री करण्यात आली, असा आरोपी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

 शिर्डी मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी रात्री येथील थत्ते मैदानावर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार नितीन देशमुख, आमदार सुनील शिंदे, आमदार लहू कानडे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ३७० कलम हटवले हा खोटा प्रचार आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यांचे प्रश्न कायम आहेत. पंतप्रधान मोदी हे तेलंगणात जाऊन माझ्यावर नकली संतान असल्याची टीका करत आहेत. माझ्या देवताससमान आई वडिलांचा त्यांनी अपमान केला आहे. हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. 

भाजप चारशे पारचा नारा देत आहेत. त्यांचे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. ज्यांनी तुकारामांची गाथा बुडविली तेच लोक संविधान बदलण्याचे बोलत आहेत. आमचे हिंदुत्व हे चुली पेटवणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे आहे, असे ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याचे सांगितले. केंद्र व भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४