शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

काश्मीरमधील जमिनींची लिथीयम उत्पादसाठी विक्री; उध्दव ठाकरेंचा आरोप 

By शिवाजी पवार | Updated: May 10, 2024 16:20 IST

शिर्डीतील महाआघाडीच्या उमेदवाराची प्रचार सभा.

शिवाजी पवार , श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्ष पाहिले तर काश्मीरमध्ये अदानी यांना लिथीयम उत्पादनासाठी जमिनींची विक्री करण्यात आली, असा आरोपी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

 शिर्डी मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी रात्री येथील थत्ते मैदानावर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार नितीन देशमुख, आमदार सुनील शिंदे, आमदार लहू कानडे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ३७० कलम हटवले हा खोटा प्रचार आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यांचे प्रश्न कायम आहेत. पंतप्रधान मोदी हे तेलंगणात जाऊन माझ्यावर नकली संतान असल्याची टीका करत आहेत. माझ्या देवताससमान आई वडिलांचा त्यांनी अपमान केला आहे. हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. 

भाजप चारशे पारचा नारा देत आहेत. त्यांचे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. ज्यांनी तुकारामांची गाथा बुडविली तेच लोक संविधान बदलण्याचे बोलत आहेत. आमचे हिंदुत्व हे चुली पेटवणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे आहे, असे ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याचे सांगितले. केंद्र व भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४