शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

कोकमठाण ग्रामपंचातीवर तीस वर्षांनंतर फडकणार भगवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पॅनलचे बहुमत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पॅनलचे बहुमत असल्याने सरपंच आपलाच होणार याच गावचे पुढारी आनंदात होते. मात्र, गुरुवारी (दि.२८) सरपंच पदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेकांच्या आनंदात विरजण पडले. असेच काहीसे कोकमठाण ग्रामपंचायतीच्या बाबतीतही घडले आहे. तेथील सरपंचपदाचा एकमेव उमेदवार हा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या गटातून निवडून आलेला असल्याने तब्बल तीस वर्षांच्या संघर्षानंतर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे; परंतु सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या (काळे गट) राष्ट्रवादीची मात्र, गोची झाली आहे.

कोकमठाण ग्रामपंचायतीमध्ये १७ पैकी आ. आशुतोष काळे गटाचे (राष्ट्रवादी काँग्रेस) सर्वाधिक ९ सदस्य, त्या खालोखाल बाळासाहेब जाधव गटाचे (शिवसेना) ६ सदस्य तर माजी आ. स्नेहलता कोल्हे गटाचे (भाजप) २ सदस्य निवडून आले आहेत. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी महाविकास आघाडीकरून एकत्रित लढविली होती. त्यानुसार सर्वाधिक सदस्य हे राष्ट्रवादीचे असल्याने त्यांचा सरपंच व त्या खालोखाल सदस्य असलेल्या शिवसेनेचा उपसरपंच असे समीकरण ठरले होते. त्यामुळे काही झाले तरी सरपंच आपलाच होणार याच आनंदात राष्ट्रवादीचे सदस्य होते. मात्र, गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीत सत्ता स्थापनेचे सर्व गणितच बदलून गेले. कारण, कोकमठाणचे सरपंच पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या ९ सदस्यांपैकी एकही महिला या प्रवर्गातून निवडून आलेली नाही. मात्र, शिवसेनेकडून या प्रवर्गातील उषाबाई एकनाथ दुशिंग या एकमेव महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सरपंच पदाच्या अधिकृत घोषणेची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. सरपंच आपलाच होणार ही राष्ट्रवादीची पुढील पाच वर्षांसाठीची आशा धूसर झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक सदस्य असतानादेखील त्यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे.

..................

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गेल्या ३० वर्षांपासून शिवसैनिकांनी संघर्ष केला आहे. कधीच पूर्ण यश मिळाले नाही. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढल्यानंतर सहा सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंच राष्ट्रवादीचा आणि उपसरपंच शिवसेनेचा असे समीकरण ठरले होते. योगायोगाने जे आरक्षण निघाले त्या पदाची महिला उमेदवार आमच्याकडे असल्याने आमचा सरपंच होऊन ग्रामपंचायतीवर ३० वर्षांनंतर भगवा फडकणार असल्याचा आनंद आहे. मात्र, ग्रामपंचायतीचा कारभार हा राष्ट्रवादीला बरोबर घेऊनच चालवणार आहोत.

- बाळासाहेब जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.