फेज-२ मुळे रखडले रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:37+5:302020-12-25T04:17:37+5:30
अहमदनगर : रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेताना गटार व जलवाहिनीच्या कामाचे नियोजन केले जाते. मात्र, शहरातील रस्त्यांची कामे करताना ...

फेज-२ मुळे रखडले रस्त्याचे काम
अहमदनगर : रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेताना गटार व जलवाहिनीच्या कामाचे नियोजन केले जाते. मात्र, शहरातील रस्त्यांची कामे करताना हे नियोजनच होत नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुरा रस्त्याचे काम सुरू होऊन तीन महिने झाले. हे काम सुरू झाल्यानंतर या मार्गावर फेज-२ चे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू होण्यास विलंब हाेत आहे.
महापालिकेने फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुरा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सदर रस्ता दुरुस्तीसाठी खोदण्यात आला. रस्ता खोदून तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला. सर्जेपुरा चौकात हे काम सुरू आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पुन्हा फेज-२ योजनेतंर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी भुयारी गटारीचे काम करण्यात आले. हे काम पूर्ण होऊन एक महिला उलटला. त्यानंतर आता पुन्हा फेज-२ चे काम हाती घेतले आहे. पाणी योजना, भुयारी गटारीची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने रस्ताकाम अधर्वट आहे. महापालिकेला आधी भुयारी गटार व पाणी योजनेचे काम करायचे होते, तर रस्ता खोदला कशासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्याचे काम हाती घेतले. रस्ता खोदला. पुणे महामार्गावरून बाजारपेठेत जाणारा हा रस्ता असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच या मार्गावर दुकानांची संख्याही मोठी आहे. रस्ता वाहतुकीसाठी याेग्य नसल्याने दुकानदारांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद होते. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुकानदारांनी व्यवसाय सुरू केले. मात्र, या मार्गावर कमालीची धूळ असल्याने दुकानातही कुणी येत नाही, असे या भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
...सूचना फोटो आहे.