शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी साईदरबारी हजेरी लावणारे ऋषी कपूर; निधनानं शिर्डी हळहळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 13:36 IST

शिर्डी आणि कपूर घराण्याचे तीन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध

- प्रमोद आहेरशिर्डी: पृथ्वीराज कपूर यांच्यापासून कपूर कुटुंब साईबाबांशी जोडले गेले. त्यांच्यानंतर राज कपूर व त्यानंतर ऋषी कपूर यांनी ही भक्तीची परंपरा कायम ठेवली. प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी कपूर कुटुंबाने साईबाबांना साकडे घातले आहे.रणबीर कपूर व कतरीना कैफच्या संबंधामुळे नाराज असलेल्या ऋषी कपूर यांनी १७ डिसेंबर २०१५ रोजी साईदरबारी येऊन बाबांना साकडे घातले होते. साईबाबांनी ऋषी कपूर यांचे गाव्हाणे ऐकले आणि महिनाभरातच रणबीर कपूर व कॅतरीना कैफ वेगळे झाले. यामुळे आनंदीत झालेल्या ऋषी कपूर यांनी नितू कपूर यांच्यासह पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये साई दरबारी हजेरी लावून बाबांना धन्यवाद दिले होते, अशी माहिती साईबाबा संस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी दिली. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल बाजीराव शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ऋषी कपूर अगदी लहानपणापासून शिर्डीला येत असल्याने शिंदे यांनी ऋषी यांच्या लहानपणीच्या आठवणीही सांगितल्या. पूर्वी समाधी चौथऱ्यावर चढून पुजा करण्यात येत असे, आपल्याला ती संधी अनेकदा मिळाली होती, असेही ऋषी कपुर म्हणाले होते. संपर्कात आलेली माणसे जोडणे हा त्यांचा छंद होता. त्यामुळे ते अनेकदा फोन करून आपली चौकशीही करत असेही शिंदे यांनी सांगितले.

ऋषी कपूर यांची आठवण सांगताना माजी मंदिर प्रमुख प्रकाश खोत यांनी सांगितले की, १९७३ च्या सुमारास बॉबी चित्रपटाची इगतपुरीजवळ शुटींग सुरू होते. तेव्हा राज कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासह संपूर्ण युनिट साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी दिक्षीत वाड्यातील प्रसादालयात या सर्वांनी भोजन घेतले होते.

समाधी चौथऱ्यावरील मार्बलच्या जाळीला राज कपूर यांच्या देणगीतुन चांदीचे वेष्टन लावण्यात आले होते. त्यावेळी राज कपूर, कृष्णा कपूर व ऋषी कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थीत होते असेही खोत यांनी सांगितले. येथील मच्छिंद्र हिंगणे व या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शिर्डी आणि कपूर घराण्याचे तीन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध आहेत. ऋषी कपूर यांनी हा ओलावा कायम ठेवला, आज त्यांच्या सारख्या साईभक्ताच्या जाण्याने शिर्डी हळहळली आहे.

टॅग्स :Rishi Kapoorऋषी कपूरshirdiशिर्डी