शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन लांबणीवर; पाणी सोडण्यासाठी शेतक-यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 17:40 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुळा धरणाचा डावा कालवा १० मार्चला सुरू करण्यात आला. डाव्या कालव्याखाली १३० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र डाव्या कालव्याखाली ओलीताखाली येण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्यातून चार दिवसात पाणी सोडण्यात येईल, अशी घोषणा ९ मार्चला मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. त्यानंतर दुस-या दिवशी डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू झाले. १३ मार्चच्या दरम्यान उजव्या कालव्यातून पाणी सुटण्याची शक्यता होती़. मात्र अद्याप पाणी न सुटल्याने शेतक-यांचे लक्ष पाटबंधारे खात्याकडे वेधले आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली २७९ पाणी वापर संस्था आहेत. पाणी वापर संस्थांनी पाटबंधारे खात्याकडे पाण्याची मागणी नोंदविली आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे़ त्यामुळे उजव्या कालव्याखालील पिकांची भूक वाढलेली आहे. पाणी कधी सोडणार? असा पश्न शेतकरी विचारत आहेत. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १३ मार्चला पाणी सुटणार असल्याचे मंत्री महोदयांनी जाहीर केले होते़. प्रत्यक्षात रविवारी दुपारपर्यंत पाणी सुटलेले नाही़. त्यामुळे ऊस लागवडी धोक्यात आल्या आहेत़. याशिवाय कांदा, गहु पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत़. उन्हाची तीव्रता वाढली असून पाटबंधारे खात्याने त्वरीत उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे़, अशी खडांबे खुर्द येथील शेतकरी विठ्ठल कार्ले यांनी सांगिेतले. मुळा उजव्या कालव्याखाली २० हजार हेक्टर पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे.  उजव्या कालव्यातून महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी ६० क्युसेकने पाणी परवापासून सुरू आहे. धरणात सध्या २० हजार ३०२ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल़, असे मुळा धरणाचे अधीक्षक अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी