शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन लांबणीवर; पाणी सोडण्यासाठी शेतक-यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 17:40 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुळा धरणाचा डावा कालवा १० मार्चला सुरू करण्यात आला. डाव्या कालव्याखाली १३० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र डाव्या कालव्याखाली ओलीताखाली येण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्यातून चार दिवसात पाणी सोडण्यात येईल, अशी घोषणा ९ मार्चला मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. त्यानंतर दुस-या दिवशी डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू झाले. १३ मार्चच्या दरम्यान उजव्या कालव्यातून पाणी सुटण्याची शक्यता होती़. मात्र अद्याप पाणी न सुटल्याने शेतक-यांचे लक्ष पाटबंधारे खात्याकडे वेधले आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली २७९ पाणी वापर संस्था आहेत. पाणी वापर संस्थांनी पाटबंधारे खात्याकडे पाण्याची मागणी नोंदविली आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे़ त्यामुळे उजव्या कालव्याखालील पिकांची भूक वाढलेली आहे. पाणी कधी सोडणार? असा पश्न शेतकरी विचारत आहेत. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १३ मार्चला पाणी सुटणार असल्याचे मंत्री महोदयांनी जाहीर केले होते़. प्रत्यक्षात रविवारी दुपारपर्यंत पाणी सुटलेले नाही़. त्यामुळे ऊस लागवडी धोक्यात आल्या आहेत़. याशिवाय कांदा, गहु पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत़. उन्हाची तीव्रता वाढली असून पाटबंधारे खात्याने त्वरीत उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे़, अशी खडांबे खुर्द येथील शेतकरी विठ्ठल कार्ले यांनी सांगिेतले. मुळा उजव्या कालव्याखाली २० हजार हेक्टर पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे.  उजव्या कालव्यातून महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी ६० क्युसेकने पाणी परवापासून सुरू आहे. धरणात सध्या २० हजार ३०२ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल़, असे मुळा धरणाचे अधीक्षक अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी