शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

बिले न देताच महावितरणकडून कृषिपंपांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST

(डमी) चंद्रकांत शेळके अहमदनगर : महावितरणकडून शेतकऱ्यांकडे सध्या वीज बिलांच्या वसुलीचा तगादा सुरू आहे. मात्र या शेतकऱ्यांना महावितरणकडून कधी ...

(डमी)

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : महावितरणकडून शेतकऱ्यांकडे सध्या वीज बिलांच्या वसुलीचा तगादा सुरू आहे. मात्र या शेतकऱ्यांना महावितरणकडून कधी बिलेच दिली जात नाहीत. केवळ मार्च एंड आला की शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावला जात असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात आहे.

नगर जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांकडे सुमारे ५ हजार कोटींची थकबाकी आहे

वसुलीसाठी महावितरण कंपनीने कृषी वीज धोरण अंतर्गत निर्लेखन, व्याज आणि विलंब सूट देऊन थकबाकी पुनर्गठीत केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १० हजार शेतकऱ्यांनी ७० कोटी रुपये वीजबिल भरले आहे. मात्र अजूनही महावितरणची वसुली जोरात सुरू आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांना वीजबिल मिळत नव्हते. गावातील वायरमनकडे थकबाकीदारांची यादी देऊन घरोघरी वीज बिल भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अचानक सुरू झालेल्या वसुलीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

--------------

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज थकबाकी

विभाग. शेतकरी संख्या. थकबाकी रक्कम

अहमदनगर ग्रामीण ९३४५९. १३७२

अहमदनगर शहर. ५६०१९. ६४१

कर्जत. ७९९३०. १२१२

संगमनेर. ९९३१८. १२४७

श्रीरामपूर ६४६७८. ५४०

------------------------------------------

एकूण. ३९३४०४. ५०१४

------------------

विज वितरण कंपनीची पठाणी वसुली सुरू आहे, मीटर रीडिंग घेण्यासाठी येत नाहीत, वेळेवर बिलही मिळत नाही. वरिष्ठांनी दट्ट्या लावला की खालचे सगळे थकबाकीच्या याद्या घेऊन वसुलीसाठी पळतात. टार्गेट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावणे, मोठ्या आवाजात बोलणे असे प्रकार सुरू असतात. वास्तविक मुबलक पावसामुळे गत पाच-सहा महिन्यात विद्युत मोटार सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. मात्र तरीही सरासरी विजेचा वापर दाखवून बिल आकारले जाते. -बाळासाहेब फटांगडे, शेतकरी तथा जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना.

---------

बिल वेळेवर मिळत नाही, वीज कर्मचारी कधीतरी बिल घेऊन वसुलीला येतात. रीडिंगचेसुद्धा तसेच आहे. सरासरी वीज बिल आकारणी पद्धत चुकीची वाटते.

-विष्णू मुटकुळे, शेतकरी, शेवगाव