शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मुळा धरणावर पावसाची विश्रांती; नदीपात्रातून आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 11:51 IST

गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़

राहुरी : गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा २५ हजार ७४० दशलक्ष घनफुटावर स्थिरावला आहे़  धरणात पाण्याची पातळी १ हजार ८११़५५ फुटावर आहे़ मुळा धरण ९८़९९ टक्के भरले आहे़ सध्याचा पाणीसाठा स्थिर ठेऊन दोन्ही कालवे व मुळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ उपयुक्त पाणीसाठा २१२३८ दशलक्ष घनफूट इतका आहे़ गेल्या वर्षी मुळा धरणात २४ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाला होता़  याशिवाय १९०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात आले होते़गेल्या वर्षी मुळा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन मिळाले होते़ नदीपात्रातील बंधाºयामध्ये पाणी शिल्लक न राहिल्याने मुळा काठाला हादरा बसला होता़  यंदा दोन्ही कालव्यातून चार आवर्तन मिळणार आहेत़ नदीपात्रातून ३ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे़ डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़ उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू आहे.आतापर्यंत मुळानगर येथे ४३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळानगर परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे़ कोतूळ येथे यंदाच्या पावसाळ्यात ८४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने सरासरी ओलांडली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन्ही कालव्याव्दारे शेतीसाठी ऐन पावसाळ्यात आवर्तन सुरू आहे़ शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ पोळ्यानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग येतो़ मात्र सध्या रब्बीच्या पेरण्यांना वेग नाही.मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शेतक-यांनी मागणी केलेली नाही़ त्यामुळे डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला नाही़ शेतकºयांनी मागणी केल्यास विसर्ग वाढविला जाईल़, असे मुळा धरण अभियंता रवींद्र आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरण