शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणावर पावसाची विश्रांती; नदीपात्रातून आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 11:51 IST

गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़

राहुरी : गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा २५ हजार ७४० दशलक्ष घनफुटावर स्थिरावला आहे़  धरणात पाण्याची पातळी १ हजार ८११़५५ फुटावर आहे़ मुळा धरण ९८़९९ टक्के भरले आहे़ सध्याचा पाणीसाठा स्थिर ठेऊन दोन्ही कालवे व मुळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ उपयुक्त पाणीसाठा २१२३८ दशलक्ष घनफूट इतका आहे़ गेल्या वर्षी मुळा धरणात २४ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाला होता़  याशिवाय १९०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात आले होते़गेल्या वर्षी मुळा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन मिळाले होते़ नदीपात्रातील बंधाºयामध्ये पाणी शिल्लक न राहिल्याने मुळा काठाला हादरा बसला होता़  यंदा दोन्ही कालव्यातून चार आवर्तन मिळणार आहेत़ नदीपात्रातून ३ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे़ डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़ उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू आहे.आतापर्यंत मुळानगर येथे ४३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळानगर परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे़ कोतूळ येथे यंदाच्या पावसाळ्यात ८४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने सरासरी ओलांडली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन्ही कालव्याव्दारे शेतीसाठी ऐन पावसाळ्यात आवर्तन सुरू आहे़ शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ पोळ्यानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग येतो़ मात्र सध्या रब्बीच्या पेरण्यांना वेग नाही.मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शेतक-यांनी मागणी केलेली नाही़ त्यामुळे डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला नाही़ शेतकºयांनी मागणी केल्यास विसर्ग वाढविला जाईल़, असे मुळा धरण अभियंता रवींद्र आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरण