शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पाऊस सुरूच, वारी येथील गोदावरीच्या पुलावर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 16:12 IST

नाशिक धरणक्षेत्रात व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रासह कोपरगाव तालुक्यात रविवारपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावातील संपर्क तुटला होता.

कोपरगाव : नाशिक धरणक्षेत्रात व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रासह कोपरगाव तालुक्यात रविवारपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावातील संपर्क तुटला होता.

सध्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी गोदावरीत ३ हजार ६०० क्युसेकने पाणी सुरु आहे. सर्वत्र मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पुढील गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रातील ओढे, नाले यांचे पाणी सरळ नदीत येत आहे. त्यातच नदीवरील सर्वच बंधाऱ्यावर पाणी अडविण्यासाठी प्लेटा टाकलेल्या असल्याने पाण्याचा फुगवटा तयार झाला आहे.

वारीच्या पुलाची उंची कमी असल्याने पूल पाण्याखाली जात आहे. पुलावर पाणी आल्याने नदीच्या पलीकडील सडे, शिंगवे यागावातील नागरिकांचा वारीशी संपर्क तुटला आहे. पुलावर पाणी असतानाही काही नागरीक आपला जीव धोक्यात घालून संरक्षक कठडे नसलेल्या या पुलावरून जीवघेणा प्रवास करण्याचे धाडस करीत होते. दरम्यान यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात वारीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊसWaterपाणी