शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:41 IST

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अहिल्यानगर : दहा लाख रुपयांसाठी राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून खुनाचा कट रचल्याचे माफीच्या साक्षीदाराने जिल्हा न्यायालयात सांगितले. खुनाचा घटनाक्रम सांगत असताना त्याला भोवळ आली. त्यामुळे कामकाज थांबवावे लागले. यावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार असून उर्वरित घटनाक्रम समोर येईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्यावर जिल्हा प्रधान न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयासमोर सोमवारपासून सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीचा सोमवारी पहिला दिवस होता. सुनावणीसाठी अॅड. उज्ज्वल निकम अहिल्यानगरला उपस्थित होते. सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी वकील दाम्पत्याच्या खुनाची माहिती दिली. ते म्हणाले, राजाराम आढाव व मनीषा आढाव (दोघे, रा. मानोरी, ता. राहुरी) हे दोघे राहुरी न्यायालयात वकिली करत होते. त्यांचा २५ जानेवारी २०२४ रोजी निघृणपणे खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी बबन मोरे, किरण दुशिंग, शुभम महाडिक, सागर खांदे, हर्षल ढोकणे अशा पाच आरोपींना अटक केली आहे. यातील हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. त्याची साक्ष नोंदविण्यात आली. वकील दाम्पत्याचे राहूरी न्यायालयातून अपहरण करून त्यांच्या मानोरी येथील घरी नेईपर्यंतचा घटनाक्रम त्याने सांगितला. ही माहिती सांगत असतानाच त्याला भोवळ आली. त्यामुळे न्यायालयीन कामकाज थांबविण्यात आले, असे निकम यांनी सांगितले. आरोपींच्या वतीने अॅड. सतीष वाणी यांनी बाजू मांडली, यावेळी न्यायालयात वकिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती. वकील दाम्पत्याच्या खुनाचे प्रकरण राज्यभर गाजले होते. विविध वकील संघटनांनी या घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायदा करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केला आहे. वकिलांच्या मागणीनंतर हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.

काय म्हणाला माफीचा साक्षीदार ? 

माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयात साक्ष दिली. घटनेच्या एक दिवस आधी आरोपींनी वकील दाम्पत्याच्या अपहरणाचा कट रचला. मयत राजाराम व मनीषा आढाव हे दोघे राहुरी न्यायालयात वकिली करत होते. आरोपी शुभम हा २५ जानेवारी २०२४ रोजी राहुरी येथील न्यायालयात गेला. त्याने मयत अॅड. राजाराम यांची भेट घेतली. मित्राचा पाथर्डी न्यायालयात आज जामीन आहे, तिकडे जायचे आहे, असे सांगून राजाराम यांना सोबत घेतले. त्यांना एका कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेले. तिथे त्यांना मारहाण केली व पत्नी मनीषा यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी मोहट्याला जायचे आहे.  तुला घेण्यासाठी शुभम कोर्टात येईल. त्याच्यासोबत तू ये, असे चलीला फोनवरून सांगितले. त्या सोबत आल्या व्यावेळी पतीचे हातपाय बांधलेले त्यांनी पाहिले. त्यांनी पतीला बीपीचा त्रास आहे. त्यांचे तोंड बांधू नका, असे सांगितले होते. त्यानंतर आरोपींनी मनीषा यांना मारहाण केली व त्यांचे तोंड बांधण्यासाठी गमचा (दुपट्टा) मागितला. शुभमने त्यांना गमचा आणून दिला. दोघांचे तोंड बांधून त्यांना एका कारमधून त्यांच्या घरी नेण्यात आले. घराच्या चाव्या पत्नीकडे होत्या. त्या त्यांनी काढून आरोपीकडे दिल्या. त्यानंतर त्यांना आरोपीनी मारहाण केली, ईथपर्यंतची माहिती माफीचा साक्षीदार ढोकणे याने दिली आहे, अशी माहिती अॅड. निकम यांनी दिली.

दीड हजार पानांचे दोषारोपपत्र 

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खुनाचा तपास पूर्ण करून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी येथील जिल्हा न्यायालयात दीड हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले. त्यामध्ये आरोपींनी वकील दाम्पत्याचा निघृणपणे खून केल्याचे नमूद आहे. पैशांसाठी हा खून केला गेला. आरोपींनी आढाव यांच्या बैंक खात्यातून पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचेही तपासात समोर आलेले आहे, असे सांगण्यात आले.

गडी गेला घरी.. 

आरोपी वकील दाम्पत्याला घेऊन त्यांच्याच घरी गेले. त्यांच्या बंगल्यावर एक गडी होता. त्याला आरोपींच्या सांगण्यावरून अॅड. राजाराम आढाव यांनी फोन करून घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचा गड़ी घटना घडली त्यावेळी घरी नव्हता. आरोपींनी सावधपणे हा कट रचलेला होता. कुणालाही संशय येणार नाही, याची काळजीही आरोपींनी घेतल्याचे दिसते. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरRahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय