शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मंत्र्यांच्या दबावामुळे चढ्या दराच्या निविदा मंजूर, राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकार; भाजप सरकारच्या काळातील निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 11:11 IST

तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विद्यापीठात कार्यक्रमास आले असता त्यांनी मूलभूत बांधकामांसाठी १०१ कोटी व संशोधन आस्थापनांच्या बळकटीकरणासाठी ५० कोटी असे एकूण १५१ कोटी रुपये मंजूर केले. यातून ८५ कोटी रुपये खर्च करुन राहुरी, धुळे, पुणे, कोल्हापूर येथे विद्यापीठाच्या आस्थापनांमध्ये मुलींची पाच वसतिगृहे व तीन सभागृह बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

सुधीर लंके

अहमदनगर : मागील भाजप सरकारच्या काळात कृषी मंत्री कार्यालयाच्या दबावामुळे राहुरी कृषी विद्यापीठाने ८५ कोटी रुपयांच्या बांधकामात चढ्या दराने निविदा मंजूर केल्या आहेत. तत्कालीन मंत्र्यांच्या दबावामुळे विद्यापीठाने यासाठी निविदांचे नियमही बदलले असून कुलसचिवांनी लेखी पत्रातच हे सर्व नमूद केले आहे.राहुरी विद्यापीठास २०१८ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विद्यापीठात कार्यक्रमास आले असता त्यांनी मूलभूत बांधकामांसाठी १०१ कोटी व संशोधन आस्थापनांच्या बळकटीकरणासाठी ५० कोटी असे एकूण १५१ कोटी रुपये मंजूर केले. यातून ८५ कोटी रुपये खर्च करुन राहुरी, धुळे, पुणे, कोल्हापूर येथे विद्यापीठाच्या आस्थापनांमध्ये मुलींची पाच वसतिगृहे व तीन सभागृह बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

मात्र, या आठ कामांसाठी १५ टक्के वाढीव दराने आलेल्या निविदा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बांधकाम उपसमितीने मंजूर केल्या. वाढीव दराच्या निविदा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानेच मंजूर करण्याची तरतूद आहे. मात्र, विद्यापीठाने त्या आपल्याच स्तरावर मंजूर केल्या. त्यासाठी मंत्र्यांच्या कार्यालयातून आलेल्या तोंडी आदेशावरुन सुधारित अर्हता निकष लागू करण्यात आले, असे विद्यापीठानेच आपल्या पत्रात म्हटले आहे. या घोटाळ्याबाबत थेट राज्यपालांकडे तक्रार झाल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी गत जानेवारीमध्ये या निविदांच्या कार्यारंभ आदेशांना स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने या प्रकरणाची अद्याप सविस्तर चौकशी केलेली नाही. सध्याही मंत्रालयातून या निविदांवरील स्थगिती उठविण्यासाठी दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पूर्वीच्या कुलसचिवांनी आदेश काढून ही कामे थांबवलेली आहेत. त्यानंतर दर कमी करुन अंदाजपत्रकीय रकमेप्रमाणे कामे करण्यास जुने ठेकेदार तयार झाले आहेत. मात्र, कुलगुरुंनी ही कामे पुन्हा सुरु करण्यास अद्याप मान्यता दिलेली नाही. - मोहन वाघ, कुलसचिव, राहुरी कृषी विद्यापीठ

विद्यापीठाचा आरोप चुकीचा : खोततत्कालीन कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मंत्र्यांनी निविदा मंजुरीसाठी तोंडी आदेश दिले हे विद्यापीठाचे म्हणणे चुकीचे आहे. असे तोंडी आदेश दिले असतील तर विद्यापीठाने त्याचवेळी लेखी हरकत का घेतली नाही? कुलसचिवांनी चुकीचा आरोप केल्याने आपण यासंदर्भात कारवाईची मागणीही केलेली आहे. तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याशी संपर्क झाला नाही. 

टॅग्स :ahmadpur-acअहमदपूरRahuriराहुरीuniversityविद्यापीठ