शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या दबावामुळे चढ्या दराच्या निविदा मंजूर, राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकार; भाजप सरकारच्या काळातील निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 11:11 IST

तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विद्यापीठात कार्यक्रमास आले असता त्यांनी मूलभूत बांधकामांसाठी १०१ कोटी व संशोधन आस्थापनांच्या बळकटीकरणासाठी ५० कोटी असे एकूण १५१ कोटी रुपये मंजूर केले. यातून ८५ कोटी रुपये खर्च करुन राहुरी, धुळे, पुणे, कोल्हापूर येथे विद्यापीठाच्या आस्थापनांमध्ये मुलींची पाच वसतिगृहे व तीन सभागृह बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

सुधीर लंके

अहमदनगर : मागील भाजप सरकारच्या काळात कृषी मंत्री कार्यालयाच्या दबावामुळे राहुरी कृषी विद्यापीठाने ८५ कोटी रुपयांच्या बांधकामात चढ्या दराने निविदा मंजूर केल्या आहेत. तत्कालीन मंत्र्यांच्या दबावामुळे विद्यापीठाने यासाठी निविदांचे नियमही बदलले असून कुलसचिवांनी लेखी पत्रातच हे सर्व नमूद केले आहे.राहुरी विद्यापीठास २०१८ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विद्यापीठात कार्यक्रमास आले असता त्यांनी मूलभूत बांधकामांसाठी १०१ कोटी व संशोधन आस्थापनांच्या बळकटीकरणासाठी ५० कोटी असे एकूण १५१ कोटी रुपये मंजूर केले. यातून ८५ कोटी रुपये खर्च करुन राहुरी, धुळे, पुणे, कोल्हापूर येथे विद्यापीठाच्या आस्थापनांमध्ये मुलींची पाच वसतिगृहे व तीन सभागृह बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

मात्र, या आठ कामांसाठी १५ टक्के वाढीव दराने आलेल्या निविदा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बांधकाम उपसमितीने मंजूर केल्या. वाढीव दराच्या निविदा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानेच मंजूर करण्याची तरतूद आहे. मात्र, विद्यापीठाने त्या आपल्याच स्तरावर मंजूर केल्या. त्यासाठी मंत्र्यांच्या कार्यालयातून आलेल्या तोंडी आदेशावरुन सुधारित अर्हता निकष लागू करण्यात आले, असे विद्यापीठानेच आपल्या पत्रात म्हटले आहे. या घोटाळ्याबाबत थेट राज्यपालांकडे तक्रार झाल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी गत जानेवारीमध्ये या निविदांच्या कार्यारंभ आदेशांना स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने या प्रकरणाची अद्याप सविस्तर चौकशी केलेली नाही. सध्याही मंत्रालयातून या निविदांवरील स्थगिती उठविण्यासाठी दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पूर्वीच्या कुलसचिवांनी आदेश काढून ही कामे थांबवलेली आहेत. त्यानंतर दर कमी करुन अंदाजपत्रकीय रकमेप्रमाणे कामे करण्यास जुने ठेकेदार तयार झाले आहेत. मात्र, कुलगुरुंनी ही कामे पुन्हा सुरु करण्यास अद्याप मान्यता दिलेली नाही. - मोहन वाघ, कुलसचिव, राहुरी कृषी विद्यापीठ

विद्यापीठाचा आरोप चुकीचा : खोततत्कालीन कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मंत्र्यांनी निविदा मंजुरीसाठी तोंडी आदेश दिले हे विद्यापीठाचे म्हणणे चुकीचे आहे. असे तोंडी आदेश दिले असतील तर विद्यापीठाने त्याचवेळी लेखी हरकत का घेतली नाही? कुलसचिवांनी चुकीचा आरोप केल्याने आपण यासंदर्भात कारवाईची मागणीही केलेली आहे. तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याशी संपर्क झाला नाही. 

टॅग्स :ahmadpur-acअहमदपूरRahuriराहुरीuniversityविद्यापीठ