मुळा, प्रवरेकाठची गावे तहानली

By Admin | Updated: May 5, 2016 00:02 IST2016-05-04T23:45:02+5:302016-05-05T00:02:06+5:30

अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व प्रवरा नदीकाठच्या गावांत एकेकाळी सुबत्ता नांदत होती़ यंदा मात्र प्रथमच या गावांच्या घशाला कोरड पडली आहे़

Radish, wildlife thirsty | मुळा, प्रवरेकाठची गावे तहानली

मुळा, प्रवरेकाठची गावे तहानली

अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व प्रवरा नदीकाठच्या गावांत एकेकाळी सुबत्ता नांदत होती़ यंदा मात्र प्रथमच या गावांच्या घशाला कोरड पडली आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी तेथील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून, नेवासा व राहुरी तालुक्यातील गावांना टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्याची वेळ ओढावली आहे़
मुळा व भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले़ हे पाणी मुळा व प्रवरा नदीपात्रातून सोडले़ आर्वतन काळात नदीकाठच्या गावांचा पाणी उपसा बंद केल्याने पाण्याअभावी या भागातील पिके करपली़ शेती उजाड झाली़ दोन्ही नद्यांच्या काठावरील लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे़ नेवासा तालुक्यातील शिरेगाव, करजगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़ यापूर्वी अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नाही, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ राहुरी तालुक्यातील दोन्ही नदीकाठच्या गावांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ राहुरी तालुक्यातील ४५ गावांसाठी पाणी योजना सुरू आहे़ भंडारदरा धरणातून मध्यंतरी आवर्तन सोडण्यात आले होते़ यातून साठवण तलाव भरून घेतल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला़ याशिवाय मुळा नदीकाठच्या गावांसाठी १४ गाव पाणी योजना कार्यान्वित आहेत़ त्यामुळे तेथील गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़
शेतीचे आवर्तन रद्द
प्रवरा नदीकाठच्या मडकी, बोधेगाव, प्रवरासंगम, टोका, बेलपिंपळगाव, माळेवाडी गावालाही सध्या टँकरने पाणी सुरू असून या भागातील बायाबापड्यांना रानोमाळ भटकंती करावी लागते़
गोदावरी काठच्या गावांसाठी पाणी योजना कार्यान्वित आहेत़ त्यामुळे या भागातील जैनपूर वगळता इतर गावांतील ग्रामस्थांना पाणी योजनांचा दिलासा मिळाला आहे़ गोदावरी काठच्या गावांतील शेती यंदा उजाड झाली आहे़ कधी नव्हे ते या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे़
शेतीसाठीचे आवर्तन थांबविले
मुळा व भंडारदरा धरणातून एप्रिल, मे आणि जूनमध्ये शेतीसाठी आवर्तन मिळत असे़ त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा सुटत होता़ परंतु यंदा आवर्तन मिळालेच नाही़ त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़

Web Title: Radish, wildlife thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.