शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले, वांबोरी चारी सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:03 IST

मुळा धरणातून सोमवारी सकाळी सहा वाजता धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. दरम्यान, वांबोरी चारीचे आवर्तन महिनाभर सुरूच राहणार आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून सोमवारी सकाळी सहा वाजता धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. दरम्यान, वांबोरी चारीचे आवर्तन महिनाभर सुरूच राहणार आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात ९०० क्‍यूसेक तर तिसऱ्या टप्प्यात सोळाशे क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २० हजार ४५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा १५ हजार ९५० दशलक्ष घनफूट आहे.

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून यापूर्वी २०० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. याशिवाय वांबोरी चारीतून १५ फेब्रुवारीपासून बंधाऱ्यांसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. वांबोरी चारीचे आवर्तन आणखी महिनाभर चालणार असून एकशे दोन बंधारे पाण्याने भरण्यात येणार आहे, असेही आंधळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीDamधरण