शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने भीती वाटायचे कारण काय? : विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:42 IST

मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही, अशीही टीकाही विखेंनी केली.

अहमदनगर ( लोणी ) : एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा हा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होत. यावरूनच भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सरकारमधील घटक पक्षच करीत असलेला विरोध आश्चर्यकारक आहे. यावरून महाविकास आघाडीतील विसंवादी सूर समोर येऊ लागला आहे. एनआयएकडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय? असा सवाल राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते असताना हीच भूमिका आपण सभागृहात मांडली होती. मात्र आज वेगवेगळी मते मांडणाऱ्या लोकांना या विषयाची आठवण झाली आहे. यापूर्वी या विषयाबाबत हीच मंडळी गप्प होती. आता त्यांनीच माध्यमांचे लक्ष वेधले असल्याचा टोला विखेंनी लगवाला.

थोरात व्यक्त करत असलेली प्रतिक्रिया हे त्यांचे स्वतःचे मत नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर राहणे हे सूत्र स्विकारायचे असते. पण थोरातांना हा विषयच समजलेला नाही. आंबेडकरवादी चळवळीचा संदर्भ या विषयाशी नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे दुसऱ्याच्या हातातील बाहले बनून भूमिका मांडण्याचा प्रयल आहे. तर मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही, अशीही टीकाही विखेंनी केली.