शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ताजनापूर टप्पा दोनसाठी ४० कोटी ४७ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 16:59 IST

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद केल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. 

शेवगाव : ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद केल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. जायकवाडी जलाशयासाठी शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमिनी बडीत क्षेत्रात गेलेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे जलाशयाभोवती किंवा बुडीत गेलेल्या शेतक-यांच्या जमिनीजवळच पुनर्वसन करून त्यांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनही योजना राबविली गेली. या योजनेद्वारे २० गावांतील ६ हजार ९६० हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी आतापर्यंत ८१ कोटी खर्च करून वितरण कुंड, यांत्रिकी पंपाची उभारणी या घटकांची कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु, वितरण व्यवस्थेची कामे होणे बाकी आहेत. यासाठी आमदार राजळे यांनी ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद या सिंचन योजनेसाठी केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी