शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

आमदारांच्या बैठकीत कुकडीच्या आवर्तनावर सकारात्मक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 21:09 IST

मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगण्यात येते.

श्रीगोंदा : मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. जयंत पाटील यांनी याचिकाकर्ते प्रशांत औटी यांचे मन वळवून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

 पाचपुते म्हणाले की, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके, संदीप नागवडे उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत कुकडीचे पाणी सोडावेच लागेल, ही स्पष्ट भूमिका घेतली. ज्या याचिकेमुळे हा विषय लांबला, त्या याचिकाकर्त्यांना आमदार अतुल बेनके यांनी फोन केला. जयंत पाटील हे स्वत: याचिकाकर्त्यांशी बोलले.

पिंपळगाव जोगे धरणासाठी २५ कोटींचा निधी वापरून डेडस्टॉकचे पाणी वापरात आणले जाईल. पाण्याचा प्रश्न कायमचाच मार्गी लागेल. या कुकडी प्रकल्पाचा सर्वांचाच मोठा फायदा होणार आहे, असे पाटील यांनी औटी यांना आश्वासन दिले. त्यामुळे प्रशांत औटी हे आपली याचिका माघार घेणार आहेत. त्यामुळे कुकडीचे आवर्तन तातडीने सुटून सर्वांना पाणी मिळेल, असेही पाचपुते यांनी सांगितले.

डिंभे- माणिकडोह बोगदा व्हावा

डिंभे ते माणिकडोह बोगदा झाला, तर एक आवर्तनाएवढे वाया जाणारे पाणी सहज उपलब्ध होईल. त्यासाठीही अशीच एक बैठक घेऊन तो विषय मार्गी लावावा. त्यामुळे कुकडीचा मोठा प्रश्न सुटून पाण्याची कमतरता जाणवणार नाही, अशी विनंती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना बबनराव पाचपुते यांनी केली.

नागवडेंची प्रतियाचिका

राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्याप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुराधा नागवडे यांनीही प्रतियाचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रश्नात आता अनुराधा नागवडेंनी आता थेट उडी घेतली आहे.

सरोदे मांडणार शेतकऱ्यांची बाजू

कुकडी पाणी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन बंद करावे, असा स्थगिती आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, अशी व्यथा मांडणारी हस्तक्षेप याचिका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. पूर्वा बोरा यांच्यामार्फत दाखल केली आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यासाठी सरोदे न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. हस्तक्षेप याचिकेवर मुख्य याचिकेसोबतच सुनावणी घेतली जाईल, अशी माहिती सहकारी वकील अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेRohit Pawarरोहित पवारJayant Patilजयंत पाटील