शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

शहरातील गोरगरीब अर्धपोटी उपाशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानावर गहू मिळाले, मात्र तांदळाची प्रतीक्षा करावी लागली. लॉकडाऊनमध्ये कामे नसल्याने गोरगरिबांना धान्याची गरज होती. ...

अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानावर गहू मिळाले, मात्र तांदळाची प्रतीक्षा करावी लागली. लॉकडाऊनमध्ये कामे नसल्याने गोरगरिबांना धान्याची गरज होती. आता अनलॉक झाले. कामेही सुरू झाली तरी लोकांना काही धान्य मिळेना, अशी स्थिती शहरातील गरजू नागरिकांची झाली आहे. एक धान्य आले तर दुसरे मिळाले नसल्याने लाभार्थींना अर्धपोटीच रहावे लागले.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ६ लाख लाभार्थींना दरमहा प्रत्येकी १० हजार मेट्रिक टन धान्याचा पुरवठा केला जातो. कोरोनाच्या लॉकडाऊनुमळे केंद्र व राज्य शासनाने अंत्योदय, प्राधान्य कुटुंब गटातील सर्व रेशन कार्डधारकांना प्रतिसदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात जिल्हास्तरावरून वितरित करण्यात आलेले धान्य रेशन दुकानदारांनी पूर्णपणे वितरित केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मे महिन्याचे धान्य कोरोनामुळे ई-पॉस मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रेशन दुकानदारांचेच थंब करायचे होते. त्यामुळे लाभार्थींना धान्य न देताच काही दुकानदारांनी धान्य वितरित केल्याचा अहवाल शासनाला सादर केल्याचे काही गावांतील नागरिक सांगत आहेत. त्यामुळे गरजूपर्यंत धान्यच पोहोचले नसल्याचे दिसते आहे.

----------

धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा

मे महिन्यापर्यंत ई-पॉस मशीनवर लाभार्थींचा अंगठा घेण्यात येत होता. परंतु कोरोना संसर्गाच्या कारणावरून मे महिन्यात रेशन दुकानदारांचाच अंगठा घेण्याचा निर्णय झाला.

परिणामी याचा दुरुपयोग अनेक दुकानदारांनी घेतल्याच्या तक्रारी लाभार्थी करीत आहेत.

प्रशासकीय पातळीवरूनही लाभार्थींना खरोखरच धान्य दिले गेले का? याची पडताळणी करणारी यंत्रणा कार्यान्वित नाही.

--------------

कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा?

दुकानावर गेले की, धान्य नसल्याचे सांगितले जाते. २०-२५ जणांना धान्य नसल्याचे सांगून घरी पाठवले जाते. गहू मिळाला, तर तांदूळ दिला जात नाही. वाटपात नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. सर्व गरजूंना धान्य मिळाले पाहिजे.

-आकाश गाडे, सिद्धार्थनगर

-------------

मे महिन्यात धान्य मिळाले. जून महिन्यात केंद्राकडून मोफत धान्यही वितरित करण्यात आले; मात्र ते आम्हाला मिळालेच नाही. एकाच वेळी दोन पावत्या काढून एकच धान्य दिले तर काही ठिकाणी धान्यच वाटप झाले नाही.

-लक्ष्मीबाई शिंदे, नगर

-----------

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मोफत धान्य दिले जाते. गेल्या महिन्यात सरकारने केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याची घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात स्वस्त धान्य दुकानदार कोणालाच धान्य देत नसल्याचे दिसते आहे. मग आमचे धान्य गेले कुठे?

-जयंत जोशी, श्रमिकनगर

------------

जिल्ह्यातील रेशन कार्डधारक

बीपीएल-६,०५,५२४

अंत्योदय-८८,६१८

केशरी-३,३५,६६०

एकूण-१०,८८,३८५

--------------

नगर शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांवर आतापर्यंत गव्हाचे पूर्णपणे वाटप झालेले आहे. गोंदिया येथे सरकारने खरेदी केलेला तांदूळ नगर जिल्ह्यासाठी पाठविण्यात आला आहे. अंतर दूर असल्याने तांदळाची उपलब्धता होण्यास वेळ लागला; मात्र बुधवारी नगर शहरासाठी ५१० क्विंटल तांदूळ मिळाला आहे, तो गुरुवारपासून वाटप होईल.

-अभिजित वांढेकर, अन्नधान्य वितरण अधिकारी, नगर

--

डमी