७०५ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:46+5:302021-01-15T04:17:46+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ ...

Polling for 705 villagers today | ७०५ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

७०५ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी आज (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या ५ हजार ७९६ जागांसाठी १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत. आपले गाव कारभारी निवडण्यासाठी १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची मतदान केंद्रावर प्रथमच व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी दीड हजार कर्मचारी, तर साडे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ९ ग्रामपंचायतीमधील काही जागा बिनविरोध झाल्याने व काही जागांवर अर्ज प्राप्त न झाल्याने तेथील जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ७०५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. ७०५ ग्रामपंचायतीसाठी ५ हजार ७९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

--------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

सर्व मतदान केंद्र सॉनिटाईज करण्यात आली असून मास्क, सॉनिटायझर, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांची तपासणी होईल. कोरोनाबाधित असेल आणि त्याला मतदान करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी शेवटचा अर्धा तास राखीव असेल. लक्षणे नसलेल्यांना नियम पाळून मतदान करता येईल.

----

१८ जानेवारीला मतमोजणी

१८ जानेवारीला सर्व तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. मतदानानंतर चौथ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.

--------------

निवडणूक निर्णय अधिकारी

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. संबंधित तहसीलदारांनी संबंधित तालुक्यातील मतदान केंद्रावर लक्ष ठेवायचे आहे. कुठेही गडबड-गोंधळ होणार नाही. याची सर्व दक्षता घेण्यात आली आहे.

---

५२ संवेदनशील गावे

जिल्ह्यात ५२ गावे संवेदनशील म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. अशा गावांमध्ये मतदान होण्यापूर्वीच्या दोन दिवस आधी पोलिसांचे पथसंचलन पार पडले आहे. तसेच या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

- उर्मिला पाटील,

उपजिल्हाधिकारी (महसूल-ग्रामपंचायत)

------------

पोलीस बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. तब्बल साडे तीन हजार पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. त्यामध्ये १२५ अधिकारी आहेत, तर दोन हजार पोलीस आणि तेराशे होमगार्ड आहेत. संवेदनशील गावांमध्ये पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मतदान केंद्रावरही बंदोबस्त असेल.

---

सोबत आकडेवारी आहे.

Web Title: Polling for 705 villagers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.