शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

मतदारनोंदणीकडे राजकीय पक्षांनी फिरवली पाठ

By admin | Updated: May 31, 2014 00:22 IST

अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान सुरू आहे.

अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे यासाठी प्रशासनाला मदत करावी, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीकडे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवली. प्रशासनामुळे लोकसभा निवडणुकीत लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचा आरोप करीत राजकीय नेत्यांनी आगपाखड केली होती. जिल्हा प्रशासनाने २९ मे पासून नावनोंदणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे किसनराव लोटके वगळता कोणीच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिला नाही. भाजपचेही कोणी पदाधिकारी बैठकीकडे फिरकले नाही. खासदार दिलीप गांधी यांचे स्वीय सहायक मात्र हजर होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी, उपजिल्हाधिकारी कर्डक आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत दुबार तसेच पत्त्यावर न सापडलेल्या तब्बल १ लाख ४९ हजार मतदारांची नावे यादीतून वगळली होती. मात्र, या नावांपैकी कोणीही आक्षेप घेतला नाही. मतदार नोंदणी अभियान सुरू असताना लोकांचे तिकडे दुर्लक्ष होते. नंतर मात्र, प्रशासनावर खापर फोडले जाते. १ जानेवारी २०१४ रोजी ज्यांना १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांना तसेच ज्यांची नावे वगळली गेली त्यांना मतदानासाठी नावनोंदणी करता येईल. मतदान केंद्र बदलासाठीही फॉर्म भरता येईल. तहसील कार्यालयात नावनोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ९ जूननंतर बीएलओ घरोघरी जाऊन नोंदणी करतील. जास्तीत जास्त मतदारांची नोंद व्हावी यासाठी राजकीय पक्षांनी बीएलओ नेमावेत अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. त्यांना जास्तीत जास्त १० फॉर्म देता येतील. (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत वापरलेली मतदान यंत्र (ईव्हीएम) जुनाट आहेत. त्यातच त्यातील डाटा सहा महिन्यांपर्यंत राखून ठेवावा लागतो. त्यामुळे ती गुंतून पडली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार १०० नवीन मतदान यंत्र लागतील. लोकसभेला ३ हजार ५६७ व सहायकारी १४ मतदान केंद्र होती. एका केंद्रावर शहरी भागात १ हजार ४०० व ग्रामीण भागात १ हजार २०० मतदार होते. विधानसभेला हे सूत्र बदलू शकते.