शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राहुरीत मल्चींगवर सेंद्रीय टरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:00 IST

भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी वसंतराव ठुबे यांची यशोगाथा

भाऊसाहेब येवलेराहुरी : भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

वसंतराव ठुबे यांनी जमिनीची उभी, आडवी नांगरट केली़ चार ट्रॉली शेणखत टाकले़ निंबोळी खताच्या १० गोण्याचा वापर केला. सहा बाय सव्वा या आकारात टरबुजाची लावणी केली. त्यासाठी शुगर किंग या टरबुजाच्या वाणाची निवड केली. बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळया टकल्या़ त्यावर मल्चींग पसरविण्यात आले. टरबुजाची लागवड केल्यानंतर दही व गोमूत्र ठिबकव्दारे देण्यात आले. मल्चींगवर छिद्र पाडून टरबुजाबरोबरच मिरचीचीही लागवड केली. एकरी चोवीस टन टरबूज निघाले. आणखी दोन तोडे होणार आहे.शासनाने अहमदनगर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. कृषी महोत्सवात वसंतराव ठुबे यांनी टरबुजाचा स्टॉल लावला होता. सेंद्रीय टरबूज असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमणावर टरबुजाला मागणी केली. ७० हजार रूपयांची विक्री कृषि महोत्सवात झाली. कृषि महोत्सवामुळे टरबुजाला चांगले मार्केट मिळाले.

राहुरी व ब्राम्हणी येथेही सेंद्रीय टरबुजाला चांगली मागणी होती. ग्राहक खुश झाले व चांगल्या प्रकारे वसंतराव ठुबे यांना अर्थप्राप्ती झाली. ठिबक व मल्चींगचा वापर केल्याने पाण्याची बचत झाली़ गवत कमी प्रमाणावर आले. रोगाचा प्रादुर्भावही कमी झाला, याशिवाय टरबुजाचे दर्जेदार उत्पादनही घेता आले. विद्राव्य खते ठिबकच्या माध्यमातून देता आले. टरबुज पीक घेताना मिरचीचेही आंतरपीक घेण्यात आले. टरबुजाचे पीक संपण्याच्या मार्गावर असताना मिरचीचा तोडा सुरू झाला आहे. मिरचीला ५० रूपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. टरबूज व मिरची पीक घेताना वसंतराव ठुबे यांना शिवकुमार कोहकडे व डी.पी.गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.बहुपीक पध्दतीवसंतराव ठुबे हे शेतामध्ये एकाच पिकावर अवलंबून राहत नाही. टरबूज-मिरची पिकांबरोबरच त्यांनी कांदा बीज उत्पादन घेतले, ऊस, कांदा व गहू ही पिके घेतली.बहुपीक पध्दती अवलंबिल्यामुळे एखाद्या पिकाला कमी भाव मिळाल्यास त्याची कसर दुस-या पिकातून भरून निघते.शेतीमालाचे भाव कोसळत असताना ग्राहकांची गरज ओळखून विविध पीक घेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे,असे ठुबे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी