अहमदनगर: शहरातील चौघांना एक वर्षासाठी जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे़ उपविभागीय अधिकारी वामन कदम यांनी गुरुवारी ही कारवाई केली असून, संबंधितांनी महिन्यातून एकदा जवळच्या पोलीस ठाण्यात हजर रहावे,असे सक्त आदेश देण्यात आले आहेत़चंद्रकांत उर्फ काका लक्ष्मण शेळके (रा़ सिव्हील हडको), सागर विजय काळे, (रा़ सुर्यनगर), सुरज बलभीम शेळके, (रा़ माणिकनगर), विशाल अशोक काळे, (रा़ रेणुकानगर), अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत़ या चार जणांना जिल्हाबंदी लागू करण्यात आली असून, त्यांनी तात्काळ जिल्ह्यातून निघून जावे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़ पुढील एक वर्षासाठी वरील चौघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़ मात्र त्यांना जवळील पोलीस ठाण्यात प्रत्येक महिन्याला हजेरी लावणे बंधनकारक आहे़ (प्रतिनिधी)
चौघांच्या तडीपारीचे आदेश
By admin | Updated: July 26, 2014 00:33 IST