‘त्या’ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश
By Admin | Updated: June 21, 2014 00:45 IST2014-06-20T23:20:06+5:302014-06-21T00:45:09+5:30
श्रीरामपूर : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने डी. एड. सी.ई.टी. मध्ये पुनर्मूल्यांकनात पात्र ठरलेल्या

‘त्या’ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश
श्रीरामपूर : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने डी. एड. सी.ई.टी. मध्ये पुनर्मूल्यांकनात पात्र ठरलेल्या ३,३२१ उमेदवारांपैकी मराठी माध्यमाच्या १०९३, उर्दू माध्यमाच्या ६६८ उमेदवारांना शिक्षक नियुक्ती आदेश दिले. उर्वरित १३६२ पात्र उमेदवारांना टप्प्याटप्प्याने नियुक्ती मिळेल़
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी शिक्षण सेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा घेतली होती. निकालानंतर संकेतस्थळावर नमुना उत्तरपत्रिका प्रकाशित झाली. त्यात दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची होती. सात प्रश्नांचे पर्याय चुकीचे होते. काही उमेदवारांनी या नमुना उत्तरपत्रिकेला खंडपीठात आव्हान दिले. ती उत्तरे चुकीची व अयोग्य आहेत, असे मत खंडपीठाने नोंदविले आहे़ त्यानंतर पुनर्मूल्यांकन समितीकडे १४४०० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. समितीच्या अहवालात ३३२१ उमेदवार शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरले. अखेर स्वप्निल कांदळकर, गणेश लवांडे, आशीष निमसे यांच्यासह अनेक उमेदवारांनी अॅड. संदीप सोनटक्के यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर मे अखेरपर्यंत नियुक्त्या देण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार आता ही कार्यवाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)