शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

श्रीरामपुरात कांदा ५० रुपये किलोवर; शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By शिवाजी पवार | Updated: October 18, 2023 17:53 IST

आवक घटली, दर टिकून राहणार.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : येथील बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या कांदा लिलावात ५ हजार रुपये क्विंटल (५० रुपये किलो) प्रमाणे उच्चांकी दर मिळाले. त्यामुळे कांद्याची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

बुधवारी बाजार समितीत ६ हजार ८२० कांदा गोण्यांची आवक झाली. यात चांगल्या प्रतीच्या मालाला ५ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. दुय्यम प्रतीचा माल ३५०० रुपये तर हलक्या दर्जाचा माल २००० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. गोल्टी कांद्याला ३६०० रुपये दर मिळाले. बाजार समितीत आता गोणीतील कांद्याची आवक कमी होत आहे. शेतकर्यांकडील साठवणूक केलेला माल आता कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळातही दर टिकून राहतील, अशी स्थिती आहे.

दुसरीकडे येथे होणाऱ्या मोकळ्या कांद्याच्या लिलावावेळी ११८ वाहने दाखल झाली. मोकळ्या कांद्यालादेखील ४००० रुपये क्विंटल दर मिळाला. दुय्यम प्रतीचा माल ३५०० रुपये क्विंटल दराने तर हलका प्रतवारीचा माल ३००० रुपये क्विंटलने विक्री झाला. गोणीतील कांद्याची आवक घटली असली तरी मोकळ्या कांद्याची आवक मात्र टिकून आहे. विशेषत: वैजापूर व गंगापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाहने बाजार समितीत येत आहेत.

नाफेडमार्फत शेतकऱ्यांकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली होती. तो माल पुन्हा बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणला जात होता. त्यामुळे कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या संस्थांकडील कांदा आता संपल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालाच्या मागणीत वाढ होऊन उच्चांकी दर मिळत आहेत. आगामी काळातील दिवाळी सणामुळे कांद्याला मागणी आहे. ते शेतकर्यांच्या पथ्यावर पडले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्र