मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले नाहीत
By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:29:55+5:302014-07-11T00:56:04+5:30
बाभळेश्वर : राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाहीत. काही मंडळी विनाकारण चर्चा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खुलासा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.

मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले नाहीत
बाभळेश्वर : राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाहीत. काही मंडळी मात्र विनाकारण या विषयाची चर्चा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खुलासा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.
मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या दिवशी आपण दिल्लीत गेलेलो नव्हतो. मुंबईतच होतो. दुसऱ्या दिवशी मतदार संघातील बैठकांमध्ये व्यस्त होतो, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, मुख्यमंत्री पद बदलाबाबत विनाकारण चर्चा वाढविण्याचा प्रयत्न झाला. राज्यात आघाडी सरकारचे चांगले काम चालू आहे.
दुष्काळाचे सर्वात मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. दुष्काळ निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील आम्ही सर्व सहकारी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. आमच्यात आपसात मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांचे काम चांगले असून या पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाही, असे त्यांनी शेवटी सांगितले.
कोरडवाहू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांना कोणताच लाभ होण्याचे धोरण नाही. त्यामुळे कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकरी विकासापासून दूरच राहणार आहेत. या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्त व कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्राने केले आहे. अच्छे दिन दूरच, उलट गॅसदर, रेल्वे भाडेवाढ केंद्राने केल्याचा टोला विखे यांनी मारला.(प्रतिनिधी)