शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:37 IST

पाथर्डी येथील सभेतून राशप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात.

अहमदनगर - लोकसभा निवडमुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराचा नारळ गावागावात फुटत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ५ उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यामध्ये नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथीलम मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे. त्याचसाठी, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रा व प्रचाराचा शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी येथे करण्यात आला. यावेळी, बोलताना लंकेंनी नाव न घेता सुजय विखेंवर टीका केली. तसेच, आत्तापर्यंत आपण तुम्हाला मुंबई दाखवली. आता, दिल्ली दाखवणार, असे म्हणत कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासनही दिलं. 

पाथर्डी येथील सभेतून राशप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात. पण त्यापेक्षा त्यांनी दहा वर्षांमध्ये काय केलं हे सांगितलं. कोरोनाची महामारी आली. या महामारीत त्यांनी जनतेला टाळ्या वाजवायला सांगितलं. या महामारीत ५० लाख लोकांचा जीव गेला. त्यावर सरकार बोलत नाही.". तर, आपल्यातून काही सरदार तिकडे गेले. तिकडे गेलेल्या सरदारांना दिल्लीमध्ये सहाव्या रांगेमध्ये स्थान मिळालं, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी गटावर नाव न घेता केली. तर, निलेश लंके यांनीही नाव न घेता सुजय विखेंना लक्ष केले. तसेच, कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासनही दिलं. 

मोहोटादेवीचं दर्शन घेऊन आपण स्वाभीमान जनसंवाद यात्रेची सुरूवात केली असून नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण या यात्रेचा समारोप करणार आहोत, त्यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निलेश लंकेंनी दिली. आपल्या भागातील लोकांचे प्रश्न, मतदारसंघातील वेगेवगळ्या अडचणींची माहिती घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दुष्काळी आणि बेरोजगारी या दोन प्रश्नांवर काम करणार असून तरुणाईच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे निलेश लंकेंनी म्हटले. तसेच, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे आहेत, काम आपण करायचे आणि नारळ त्यांनी फोडायाचा, अस काम चालतं. शेतकऱ्यांना वेढीस धरलं जातं, अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. स्वत: काचेच्या घरात राहतात आणि दुसऱ्याच्या घरावर दगड टाकतात, असे म्हणत विखे पाटलांवर लंकेनी निशाणा साधला. 

हे देवीच्या दारातही आपली जहागिरी दाखवात. पण, आपण देवी मातेचा सच्चा भक्त आहे. देवीचं दर्शन घेतलं, आता डायरेक्ट दिल्ली. तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो दिल्लीला. मला अनेकजण म्हणतात अधिवेशन काळात किती लोकं आणतो रे, २०० ते ४०० लोकं घेऊन जातो मी अधिवेशनाला. आजपर्यंत तुम्हाला कोणी संसद दाखवली का, आता मी सगळा लोंढाच घेऊन जातो दिल्लीला, असे म्हणत लंकेंनी कार्यकर्ते व मतदारांना दिल्लीवारीचे आश्वासन दिलं. तसेच, मी जे बोलतो ते करतो, आणि जे करतो तेच बोलतो. भविष्यात मला संधी दिल्यास प्रत्येक तालुक्यात MIDC उभी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. बेरोजगारी कमी झाली पाहिजे, तरुणांना काम मिळालं पाहिजे, असे लंकेंनी म्हटले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ahmednagar-pcअहमदनगरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sujay Vikheसुजय विखेnilesh lankeनिलेश लंकेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४