शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच- पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंची गर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:07 IST

बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

पारनेर : आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून सेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे.  बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी केली.पारनेर-नगर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पारनेर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे बोलत होते. आमदार विजय औटी, जयश्री औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, राणी लंके, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपप्रमुख रामदास भोसले, गणेश शेळके, सुरेश बोरुडे, दत्तात्रय कुलट, शिवाजी बेलकर उपस्थित होते.निवडणुकीपुरते आम्ही शिवछत्रपतींचं नाव घेत नाही. ‘छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत. शेतक-यांची वाट लावली. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. ती खरी शेतक-यांची बँक आहे. आज बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आपण स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्र मला भगवेमय झालेला पहायचाय. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठाकरे म्हणाले.

दारातल्या चपल्या हीच आपली संपत्ती

सेनापती बापट माझ्या आजोबांना म्हणजे केशवराव ठाकरे यांना भेटायला यायचे. आमच्या दादरच्या घरी बैठका व्हायच्या. घर छोटे होते. घराबाहेर चपलांचा खच पडला होता. तो चपलांचा खच आजोबांनी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दाखविला आणि म्हणाले, हे काय आहे? वडील म्हणाले, चपला आहेत. तर आजोबा म्हणाले, ‘नाही. हे आपले वैभव आहे. एव्हढे लोकं आपल्याकडं येतात, तेच आपली संपत्ती आहे.’

स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका

२०५० साली शेतक-यांना दुप्पट भाव देऊ, २०२५ साली सर्वांना मोफत घरे देणार अशी घोषणा उद्धव ठाकरे करीत असतानाच लोकांनी टाळ्या वाजविल्या. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘अरे टाळ्या काय वाजवता? अशीच स्वप्ने दाखवूनच ते (भाजप) सत्तेत आले. केली का तुमची स्वप्ने पूर्ण? दिले का तुम्हाला अच्छे दिन? म्हणून सांगतो, भानावर या, अशा स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना