नातेवाईकही वाळीत चार पिढ्यांपासून ३० कुटुंबांच्या वाट्याला उपेक्षा

By Admin | Updated: October 10, 2016 01:06 IST2016-10-10T00:46:49+5:302016-10-10T01:06:11+5:30

अरुण वाघमोडे , अहमदनगर आंतरजातीय विवाह केल्याने ६० वर्षांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका तिरमली कुटुंबासह त्यांच्या नातेवाइकांना याच समाजातील जातपंचायतीने

Neglected relative of relatives of relatives of four generations | नातेवाईकही वाळीत चार पिढ्यांपासून ३० कुटुंबांच्या वाट्याला उपेक्षा

नातेवाईकही वाळीत चार पिढ्यांपासून ३० कुटुंबांच्या वाट्याला उपेक्षा


अरुण वाघमोडे , अहमदनगर
आंतरजातीय विवाह केल्याने ६० वर्षांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका तिरमली कुटुंबासह त्यांच्या नातेवाइकांना याच समाजातील जातपंचायतीने वाळीत टाकले़ तीन पिढ्या लोटल्या. या कुुटुंबांचा मोठा विस्तार विस्तार झाला़ जातपंचायतीने ठेवलेला ठपका मात्र आजही कायम आहे़ ३० कुटुंबांतील सुशिक्षित झालेली चौथी पिढी आता जातीत सामील करून घेण्यासाठी संघर्ष करत आहे़ जातीत घ्यावे, यासाठी २० लाख रुपये देण्याचे मान्य केले, तरी पंचांनी जातीत न घेतल्याने आता त्यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला आहे़
श्रीगोंदा फॅक्टरीजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या जोशी वस्तीत ४०० भटके विमुक्त कुटुंब गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत़ तिरमली कुटुंबातील ३० ते ४० कुटुंबही येथे राहतात़ ६० वर्षांपर्वी या कुटुंबात दुसऱ्या जातीतील महिला आल्याने त्यांना बहिष्कृत केले़ बहिष्कृत केलेल्या कुटुंबांतील मुला-मुलींचे कुठेच लग्न जमेनात़ पर्याने या कुुटुंबांना पुन्हा आंतरजातीय विवाह करण्याची वेळ आली़ तेव्हा पुन्हा जातपंचायत बसली आणि या कुटुंबांवर ठपका ठेवण्यात आला़ आज या २५ ते ३० कुटुंबांत १३० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. अनेक मुली दहावी, बारावी, तर दहा ते बारा मुले पदवीचे शिक्षण घेत आहेत़ अनेकांची पक्की घरेही आहेत़ मात्र केवळ जातपंचायतीने बहिष्कृत केल्याने या कुटुंबांतील मुले आणि मुलींची कुठेच सोयरीक जमेना़ यांच्याशी नाते जोडले, तर आपल्यालाही पंच बहिष्कृत करतील, अशी या समाजातील लोकांना भीती आहे़ तर ज्यांनी या बहिष्कृत कुटुंबांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना धमकी देऊन नाते तोडण्यास भाग पाडले़ सार्वजनिक कार्यक्रमात या कुटुंबांना सामील करून घेतले जात नाही़ अंत्यविधीसाठीही त्यांच्याकडे कुणाला येऊ दिले जात नाही़ उपेक्षित जीवन जगण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे़ जातीपंचायतीसमोर व्यथा मांडूनही त्यांची दखल घेतली नाही़ ४
श्रीगोंदा फॅक्टरी येथील बहिष्कृत केलेल्या कुटुंबांतील मंगल गायकवाड, सुरेश पालवे, राहुल गायकवाड, चंदर पालवे, अण्णा गायकवाड, गंगाराम गायकवाड आदी सुशिक्षित तरुणांनी या जातपंचायतीविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे निर्णय घेतला आहे़ या लढ्यात लोकाधिकारी आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़ अरुण जाधव यांनी पुढाकार घेतला आहे़ आठ दिवसांपूर्वी जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़
श्रीगोंदा फॅक्टरी येथून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या या कुटुंबातील नातेवाइकांनाही जातपंचायतीने बहिष्कृत केले आहे़ यामध्ये कोपरगाव ३, आष्टी १, संगमनेर २, पाटसरा ४, तर शेवगाव येथील २ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे़

Web Title: Neglected relative of relatives of relatives of four generations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.