शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. ...

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा हा निकाल चार टक्क्यांनी जास्त आहे. प्रत्येक निकालात मुलांच्या तुलनेत मुली बाजी मारतात. मात्र या निकालात मुले-मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जवळपास सारखेच आहे.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ४० हजार ५५७ मुले व ३० हजार ३२ मुली अशा एकूण ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ४० हजार ५५५ मुले व ३० हजार ३० मुली अशा एकूण ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर ४० हजार ५४२ (९९.९६ टक्के) मुले व ३० हजार २४ (९९.९८ टक्के) मुली असे एकूण ७० हजार ५६६ (९९.९७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी (मार्च २०२०) नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता.

---------------

१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाला.

या निकालात नगर जिल्ह्यातून ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन बोर्डाकडे पाठवले होते. पैकी ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे केवळ १९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले.

---------------

तालुकानिहाय निकाल

तालुका टक्केवारी

अकोले १००

कोपरगाव १००

नेवासा १००

श्रीगोंदे १००

जामखेड ९९.९५

कर्जत ९९.८८

नगर ९९.९८

पारनेर ९९.९७

पाथर्डी ९९.९५

राहाता ९९.९६

राहुरी ९९.९५

संगमनेर ९९.९५

शेवगाव ९९.९७

श्रीरामपूर ९९.९७

--------------

एकूण ९९.९७ टक्के

----------------

वेबसाईट बंद पडल्याने मुलांचा हिरमोड

शुक्रवारी दुपारी १ वाजता परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेबसाईटवर ॲानलाइन निकाल मिळणार होता. परंतु एकही साईट चालत नसल्याने दुपारी चारपर्यंत मुलांना निकाल मिळालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही हिरमोड झाला. अनेक विद्यार्थी निकालासाठी मित्र, नातेवाइकांना फोन करून माहिती घेत होते.

----------

९७ टक्के रीपिटरही उत्तीर्ण

जिल्ह्यातून २५७२ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील २५१६ जण (९७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यातील ३१ जण विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. नेहमीपेक्षा पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्णचे प्रमाण यंदा जास्त आहे.

-------------