शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. ...

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा हा निकाल चार टक्क्यांनी जास्त आहे. प्रत्येक निकालात मुलांच्या तुलनेत मुली बाजी मारतात. मात्र या निकालात मुले-मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जवळपास सारखेच आहे.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ४० हजार ५५७ मुले व ३० हजार ३२ मुली अशा एकूण ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ४० हजार ५५५ मुले व ३० हजार ३० मुली अशा एकूण ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर ४० हजार ५४२ (९९.९६ टक्के) मुले व ३० हजार २४ (९९.९८ टक्के) मुली असे एकूण ७० हजार ५६६ (९९.९७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी (मार्च २०२०) नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता.

---------------

१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाला.

या निकालात नगर जिल्ह्यातून ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन बोर्डाकडे पाठवले होते. पैकी ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे केवळ १९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले.

---------------

तालुकानिहाय निकाल

तालुका टक्केवारी

अकोले १००

कोपरगाव १००

नेवासा १००

श्रीगोंदे १००

जामखेड ९९.९५

कर्जत ९९.८८

नगर ९९.९८

पारनेर ९९.९७

पाथर्डी ९९.९५

राहाता ९९.९६

राहुरी ९९.९५

संगमनेर ९९.९५

शेवगाव ९९.९७

श्रीरामपूर ९९.९७

--------------

एकूण ९९.९७ टक्के

----------------

वेबसाईट बंद पडल्याने मुलांचा हिरमोड

शुक्रवारी दुपारी १ वाजता परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेबसाईटवर ॲानलाइन निकाल मिळणार होता. परंतु एकही साईट चालत नसल्याने दुपारी चारपर्यंत मुलांना निकाल मिळालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही हिरमोड झाला. अनेक विद्यार्थी निकालासाठी मित्र, नातेवाइकांना फोन करून माहिती घेत होते.

----------

९७ टक्के रीपिटरही उत्तीर्ण

जिल्ह्यातून २५७२ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील २५१६ जण (९७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यातील ३१ जण विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. नेहमीपेक्षा पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्णचे प्रमाण यंदा जास्त आहे.

-------------