शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. ...

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा हा निकाल चार टक्क्यांनी जास्त आहे. प्रत्येक निकालात मुलांच्या तुलनेत मुली बाजी मारतात. मात्र या निकालात मुले-मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जवळपास सारखेच आहे.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ४० हजार ५५७ मुले व ३० हजार ३२ मुली अशा एकूण ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ४० हजार ५५५ मुले व ३० हजार ३० मुली अशा एकूण ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर ४० हजार ५४२ (९९.९६ टक्के) मुले व ३० हजार २४ (९९.९८ टक्के) मुली असे एकूण ७० हजार ५६६ (९९.९७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी (मार्च २०२०) नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता.

---------------

१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाला.

या निकालात नगर जिल्ह्यातून ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन बोर्डाकडे पाठवले होते. पैकी ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे केवळ १९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले.

---------------

तालुकानिहाय निकाल

तालुका टक्केवारी

अकोले १००

कोपरगाव १००

नेवासा १००

श्रीगोंदे १००

जामखेड ९९.९५

कर्जत ९९.८८

नगर ९९.९८

पारनेर ९९.९७

पाथर्डी ९९.९५

राहाता ९९.९६

राहुरी ९९.९५

संगमनेर ९९.९५

शेवगाव ९९.९७

श्रीरामपूर ९९.९७

--------------

एकूण ९९.९७ टक्के

----------------

वेबसाईट बंद पडल्याने मुलांचा हिरमोड

शुक्रवारी दुपारी १ वाजता परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेबसाईटवर ॲानलाइन निकाल मिळणार होता. परंतु एकही साईट चालत नसल्याने दुपारी चारपर्यंत मुलांना निकाल मिळालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही हिरमोड झाला. अनेक विद्यार्थी निकालासाठी मित्र, नातेवाइकांना फोन करून माहिती घेत होते.

----------

९७ टक्के रीपिटरही उत्तीर्ण

जिल्ह्यातून २५७२ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील २५१६ जण (९७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यातील ३१ जण विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. नेहमीपेक्षा पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्णचे प्रमाण यंदा जास्त आहे.

-------------