शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. ...

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा हा निकाल चार टक्क्यांनी जास्त आहे. प्रत्येक निकालात मुलांच्या तुलनेत मुली बाजी मारतात. मात्र या निकालात मुले-मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जवळपास सारखेच आहे.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ४० हजार ५५७ मुले व ३० हजार ३२ मुली अशा एकूण ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ४० हजार ५५५ मुले व ३० हजार ३० मुली अशा एकूण ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर ४० हजार ५४२ (९९.९६ टक्के) मुले व ३० हजार २४ (९९.९८ टक्के) मुली असे एकूण ७० हजार ५६६ (९९.९७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी (मार्च २०२०) नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता.

---------------

१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाला.

या निकालात नगर जिल्ह्यातून ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन बोर्डाकडे पाठवले होते. पैकी ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे केवळ १९ विद्यार्थी अनुतीर्ण झाले.

---------------

तालुकानिहाय निकाल

तालुका टक्केवारी

अकोले १००

कोपरगाव १००

नेवासा १००

श्रीगोंदे १००

जामखेड ९९.९५

कर्जत ९९.८८

नगर ९९.९८

पारनेर ९९.९७

पाथर्डी ९९.९५

राहाता ९९.९६

राहुरी ९९.९५

संगमनेर ९९.९५

शेवगाव ९९.९७

श्रीरामपूर ९९.९७

--------------

एकूण ९९.९७ टक्के

----------------

वेबसाईट बंद पडल्याने मुलांचा हिरमोड

शुक्रवारी दुपारी १ वाजता परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेबसाईटवर ॲानलाइन निकाल मिळणार होता. परंतु एकही साईट चालत नसल्याने दुपारी चारपर्यंत मुलांना निकाल मिळालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही हिरमोड झाला. अनेक विद्यार्थी निकालासाठी मित्र, नातेवाइकांना फोन करून माहिती घेत होते.

----------

९७ टक्के रीपिटरही उत्तीर्ण

जिल्ह्यातून २५७२ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील २५१६ जण (९७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यातील ३१ जण विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. नेहमीपेक्षा पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्णचे प्रमाण यंदा जास्त आहे.

-------------