शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
2
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
3
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
4
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
5
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
6
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
7
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
8
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
9
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
10
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
11
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
12
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
13
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
14
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
15
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
16
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
17
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
18
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
19
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
20
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग

मुरुमाने केली जातेय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने ...

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने या मुरुमाचा चिखल होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर-मनमाड हा मार्ग जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून परिचित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे बीओटी तत्त्वावर काम झाले होते. प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली. विशेषतः कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे अनेकांना रस्त्यावर अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. न्यायालयाच्या आदेशाने मार्गावरील टोल वसुलीही बंद करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही रस्त्याचे भाग्य उजळले नाही.

..............

दहा कोटींचा निधी गेला कुठे

कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने दहा कोटींचा निधीही दिला होता. जागतिक बँक प्रकल्प विभागाने दुरुस्तीसाठी चार कंत्राटदार नेमून या रस्त्याची दुरुस्ती केली. पण एवढा मोठा निधी मिळूनही रस्त्याची अवस्था फारशी सुधारलेली कुठेच दिसली नाही. या रस्त्यावरील अनेक लहान- मोठे खड्डे तसेच कायम आहेत तर काही ठिकाणी केवळ जुजबी दुरुस्ती केली गेली. मागील महिन्यात आठवडाभर झालेल्या पावसाने पुन्हा रस्त्याचे खरे रूप उघडे पडले. त्यामुळे दहा कोटी कुठे गेले असा सवाल उपस्थित झाला.

.............................

चिखलामुळे अपघात

सद्य:स्थितीत अनेक ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी पाणी साचून गटारे झाली आहेत. या रस्त्यावर मुरूम टाकला जात आहे. रिमझिम पावसामुळे या मुरूमाचा चिखल होऊन अपघाताची संख्या वाढली आहे.

..........

दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प बँकेच्या माध्यमातून या रस्त्याच्या डागडुजी दरम्यान अनेक ठिकाणी दुरुस्ती केली. काही ठिकाणी साईड गटारांचे, साईडपट्ट्यांचे काम केले गेले. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.

-रवींद्र चौधरी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोपरगांव

..............

कोल्हार ते कोपरगाव रस्त्यासाठी राज्य सरकारने दहा कोटींचा निधी दिला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक प्रकल्पाच्या अंतर्गत केवळ तात्पुरती मलमपट्टी केली गेली. आता रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले जात आहेत. मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग झालेला नसून ठरावीक कंत्राटदारांचे चोचले पुरविल्या गेल्याने हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनत आहे.

-राजेद्र निर्मळ, राहाता तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस.

270721\2440img-20210727-wa0146.jpg

नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी चक्क मुरूमाने...अपघातांचा धोका वाढला.दोन महिन्यापुर्वी खर्च केलेले दहा कोटी गेले पाण्यात