शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

मुरुमाने केली जातेय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने ...

अहमदनगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार ते कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. थोड्याशा पावसाने या मुरुमाचा चिखल होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर-मनमाड हा मार्ग जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून परिचित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे बीओटी तत्त्वावर काम झाले होते. प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली. विशेषतः कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे अनेकांना रस्त्यावर अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. न्यायालयाच्या आदेशाने मार्गावरील टोल वसुलीही बंद करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही रस्त्याचे भाग्य उजळले नाही.

..............

दहा कोटींचा निधी गेला कुठे

कोल्हार ते कोपरगाव या ६० किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने दहा कोटींचा निधीही दिला होता. जागतिक बँक प्रकल्प विभागाने दुरुस्तीसाठी चार कंत्राटदार नेमून या रस्त्याची दुरुस्ती केली. पण एवढा मोठा निधी मिळूनही रस्त्याची अवस्था फारशी सुधारलेली कुठेच दिसली नाही. या रस्त्यावरील अनेक लहान- मोठे खड्डे तसेच कायम आहेत तर काही ठिकाणी केवळ जुजबी दुरुस्ती केली गेली. मागील महिन्यात आठवडाभर झालेल्या पावसाने पुन्हा रस्त्याचे खरे रूप उघडे पडले. त्यामुळे दहा कोटी कुठे गेले असा सवाल उपस्थित झाला.

.............................

चिखलामुळे अपघात

सद्य:स्थितीत अनेक ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी पाणी साचून गटारे झाली आहेत. या रस्त्यावर मुरूम टाकला जात आहे. रिमझिम पावसामुळे या मुरूमाचा चिखल होऊन अपघाताची संख्या वाढली आहे.

..........

दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक प्रकल्प बँकेच्या माध्यमातून या रस्त्याच्या डागडुजी दरम्यान अनेक ठिकाणी दुरुस्ती केली. काही ठिकाणी साईड गटारांचे, साईडपट्ट्यांचे काम केले गेले. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.

-रवींद्र चौधरी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोपरगांव

..............

कोल्हार ते कोपरगाव रस्त्यासाठी राज्य सरकारने दहा कोटींचा निधी दिला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक प्रकल्पाच्या अंतर्गत केवळ तात्पुरती मलमपट्टी केली गेली. आता रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले जात आहेत. मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग झालेला नसून ठरावीक कंत्राटदारांचे चोचले पुरविल्या गेल्याने हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनत आहे.

-राजेद्र निर्मळ, राहाता तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस.

270721\2440img-20210727-wa0146.jpg

नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी चक्क मुरूमाने...अपघातांचा धोका वाढला.दोन महिन्यापुर्वी खर्च केलेले दहा कोटी गेले पाण्यात