शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जामखेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून - पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:45 IST

जामखेड येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड व एक अल्पवयीन अशा दोघांना ताब्यात घेतले. दीड वर्षांपासूनच्या पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमुख्य आरोपी गोविंद गायकवाडसह दोघे जेरबंद

अहमदनगर : जामखेड येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड व एक अल्पवयीन अशा दोघांना ताब्यात घेतले. दीड वर्षांपासूनच्या पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.जामखेड येथे दि. २८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जामखेडचा माजी सरपंच कैलास माने याच्यासह प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन गोरख जाधव, बापू रामचंद्र काळे अशा पाचजणांना अटक केली असून, हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड (वय २२, रा. तेलंगसी, ता. जामखेड, हल्ली शिवशंकर तालीम, जामखेड) फरार होता. स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, तसेच जामखेड पोलीस अशी पोलिसांची विविध पथके आरोपींच्या तपासासाठी फिरत होती. अखेर बुधवारी (दि. २ मे) मध्यरात्री पथकाने गायकवाड व आणखी एक अल्पवयीन आरोपी या दोघांना मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे ) येथून ताब्यात घेतले. तिसरा आरोपी विजय आसाराम सावंत (रा. वाकी, ता. जामखेड) फरार आहे. या तिघांनीच गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस चौकशीत बरिच माहिती या आरोपींकडून मिळाली आहे.बाचाबाची ते हत्याकांडगोविंद गायकवाड व राळेभात बंधू यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून वितुष्ट होते. डिसेंबर २०१६मध्ये राळेभात कुटुंबियांच्या परिचयातील एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना गोविंद गायकवाडकडून त्या वृद्धाच्या अंगावर रस्त्यावरील पाणी उडाले. त्यामुळे वृद्धाने याचा जाब गोविंदला विचारला. त्याचा राग आल्याने गोविंदने त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. याबाबत संबंधित वृद्धाने योगेश राळेभात व राकेश राळेभात यांना माहिती दिली. त्यानंतर राळेभात बंधूंनी गोविंदला गाठून मारहाण केली. तेथूनच या वादाला सुरूवात झाली. पुढे हा वाद विकोपाला गेला, परंतु काही लोकांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते भांडण मिटले. त्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद आलीच नाही. त्यानंतर या दोन गटांत कायमच खुन्नस राहिली. रस्त्याने येता-जाता रागाने पाहणे, शेरेबाजी करणे असे प्रकार सुरूच होते. राळेभात गटाचे हे वर्चस्व सहन न झाल्याने गोविंद गायकवाडने राळेभात बंधूंचा काटा काढण्याचा निश्चय केला. योगेश व राकेश एकाच वेळी एकांतात कुठे भेटतील, अशा संधीच्या शोधात तो गेल्या अडिच महिन्यांपासून होता. हत्येच्या घटनेपूर्वीही त्याने एक-दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी ठरला नाही. अखेर गोविंदने दि. २८ रोजी सायंकाळी योगेश व राकेश यांना एकांतात गाठलेच. गोविंदने योगेशवर, तर दुसऱ्या अल्पवयीन साथीदाराने राकेशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात तिसरा आरोपी विजय सावंत याचाही सहभाग होता. परंतु तो अद्याप फरार आहे, अशी कबुली खुद्द गोविंद व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.मध्यप्रदेशातून आणले पिस्तूलराळेभात गटासोबत रोजच होणाºया कटकटीला गोविंद वैतागला होता. एक काय तो निकाल लावण्याचा चंग त्याने बांधला. त्यातूनच हत्येचा प्लॅन पुढे आला. योगेश व राकेश यांना मारण्यासाठी गोविंदने दोन पिस्तुल व काही काडतुसे मध्यप्रदेशला जाऊन आणली. पोलिसांनी आता ती जप्त केल्याचे समजते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडPoliceपोलिस