शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गौतम हिरण यांच्या हत्येप्रकरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याप्रकरणात सोमवारी पोलिसांनी शहरातील दोन सराईत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याप्रकरणात सोमवारी पोलिसांनी शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासाची सर्व माहिती गृहमंत्र्यांकडे सादर केली जाणार असून, मंगळवारी अधिवेशनात या हत्याकांडावर प्रकाश पडेल.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सोमवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, संगमनेर येथील उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक संजय सानप उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बिट्टू उर्फ रावजी वायकर व सागर गंगावणे यांचा समावेश आहे. हे दोघेही श्रीरामपूर शहरातील असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वायकर याच्याविरूद्ध २०१९ मध्ये एका कापसाच्या व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पाटील म्हणाले, प्रारंभी या गुन्ह्यात बेपत्ता असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात खूप लोकांची चौकशी केली. तीन ते चार पथके तपासात गुंतले आहेत. एकट्या शहर पोलीस ठाण्याच्या पथकाचे हे काम नाही. घाटी येथील रुग्णालयात मयत हिरण यांचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालात डोक्यावर गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी अधिवेशनात पोलीस तपासात हलगर्जीपणाचा आरोप केला होता. त्याबाबत मनोज पाटील यांना विचारले असता तसे काही असल्यास निदर्शनास येईल, असे ते म्हणाले.

---------

अधिवेशनात पडणार प्रकाश

हिरण यांचे अपहरण आणि हत्येमागील कारणाचा उलगडा मात्र मनोज पाटील यांनी केला नाही. केवळ आरोपींना परिसरातून अटक केल्याचे त्यांनी सांगितले. गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग, हत्येमागील प्रमुख कारण तसेच हिरण यांचा मृतदेह कोठे लपविला याविषयी बोलण्याचे त्यांनी टाळले. मंगळवारी अधिवेशनात माहिती दिली जाणार असून, आता काहीही सांगणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.

-------------