शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

आईची काळजी वाढली ; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवतेय शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST

संगमनेर : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून शिक्षण संस्था, शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये बंद असून, विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने ...

संगमनेर : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून शिक्षण संस्था, शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये बंद असून, विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी तर काही ठिकाणी ती वाढत असताना शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र आपल्या मुलाला शाळेत पाठविताना प्रत्येक आईला काळजी वाटते आहे. मुलांच्या आरोग्याबरोबर त्यांचे शिक्षणही महत्त्वाचे असून, काळजावर दगड ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवत आहेत.

जिल्ह्यात माध्यमिक शाळांची घंटा वाजल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आठवी ते बारावीच्या दीडशे शाळा सुरू झाल्या. त्यात १४ हजार ७७८ विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली गेली. काही गावात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शासन निर्णय काढून सूचना दिल्या. त्यानुसार, शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर, तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात एकूण १ हजार ५९६ गावे असून, ८४९ गावांमध्ये कोरोना रुग्ण नाहीत. जिल्ह्यात आठवीपासून बारावीपर्यंत सुमारे तेराशे शाळा आहेत. त्यापैकी १५ जुलैला १३३ तर १६ जुलैला १५१ शाळा जिल्ह्यात सुरू झाल्या असून, त्यात १४ हजार ७७८ विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली गेली आहे.

------------------

अशी घ्यावी काळजी

शाळेत मास्क काढू नये. शाळेतून घरी आल्यानंतर शाळेतील कपडे धुण्यासाठी टाकावेत, अंघोळ करावी. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. जेवण करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. थंडी, ताप जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

------------

शासनाने अवलंबिलेल्या धोरणानुसार, शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते आहे. पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करत सामाजिक अंतराचे नियम पाळत शाळा सुरू केल्या आहेत.

- साईलता सामलेटी, गटशिक्षण अधिकारी, संगमनेर पंचायत समिती

------------

ऑनलाइन शिक्षण; समस्यांचा सामना

कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येते आहे; मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक अडचणी आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ॲण्डॉइड मोबाइल, इंटरनेट, संगणक, लॅपटाॅप या गोष्टी असणे आवश्यक आहेत; मात्र ग्रामीण भागात आजही सर्वसामान्य पालकांकडे ॲण्डॉइड मोबाइल नसतो, मोबाइल असला तर रेंज नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

--------------

तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा

अकोले ४६, संगमनेर २२, कोपरगाव ४, राहाता २४, राहुरी ५, श्रीरामपूर ३, नेवासा १४, शेवगाव ४, पाथर्डी ११, जामखेड २, कर्जत १, श्रीगोंदा ४, पारनेर २, नगर ७

-------------

मुलगा विज्ञान शाखेत बारावीत शिक्षण घेतो. सध्या ऑनलाइन पद्धतीने त्याचे शिक्षण सुरू आहे. काही दिवस महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ते पुन्हा बंद झाले. शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याचा निर्णय चांगला आहे; मात्र कोरोनामुळे काळजी वाटते आहे.

- शीतल विजय डांगे, रा. कनकुरी, ता. राहाता.

------------

शाळा सुरू होईल, असा संदेश शाळेकडून मोबाइलवर मिळाला. त्याचवेळी काळजी वाटली. कोरोना काळात आम्ही मुलांची विशेष काळजी घेतो. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. नियमांचे पालन व्हावे, हीच अपेक्षा आहे. शाळा सुरू करायला हरकत नाही.

- सारिका प्रीतम गांधी, रा. आश्वी बुद्रूक, ता. संगमनेर.